एक्स्प्लोर

आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्काऱ्यांना शंभर दिवसांत फाशी? जानेवारीत प्रस्ताव आणणार : सूत्र

बलात्कार प्रकरणातील आरोपींचा तपास करुन 100 दिवसात त्यांना फाशी होईल, असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तसा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुंबई : हैदराबादमधील तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आंध्र प्रदेश सरकारने 21 दिवसांच्या आत अशा प्रकरणांचा निकाल देण्याची तरतूद केली. आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्काऱ्यांना शंभर दिवसांच्या आत फाशी देण्याचा प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारकडून याबाबत जानेवारी महिन्यात प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशप्रमाणे  बलात्कार प्रकरणांचा तातडीने तपास करुन फाशी देण्याचा प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपींचा तपास करुन 100 दिवसात त्यांना फाशी होईल, असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून सादर केला जाईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. बलात्काऱ्यांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. या प्रस्तावाचा आराखडा तयार करून तो सरकारला सादर करण्याची भूमिका असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अशा प्रस्तावा बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यावेळी अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. मात्र बलात्काऱ्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे, याचं समर्थन करणारा मोठा वर्ग होता. या सर्वांमागे बलात्काऱ्यांच्या शिक्षेस होत असलेला उशीर मुख्य कारण होतं. बलात्काऱ्यांना तातडीने शिक्षा होणे गरजेचं आहे, अशी मागणी देशभरातून सुरु झाली आहे. दोषींच्या शिक्षेच्या दिरंगाईविषयी चर्चा सुरु असताना आंध्र प्रदेश सरकारने अशा गुन्हेगारांना तातडीने फाशी देण्याचा कायदा संमत केला.

महाराष्ट्रातही असा कायदा आणावा अशी मागणी केली जात होती. आता महाराष्ट्रातही लवकरच असा कायदा आणण्याबाबत प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. असा कायदा समंत झाल्यास आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्र असा कायदा करणारे देशातील दुसरे राज्य ठरेल.

आंध्र प्रदेश सरकारकडून 'दिशा' विधेयक मंजूर

बलात्कार प्रकरणांचे निकाल लवकरात लवकर लागावे यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा विधेयक मंजुर केलं. बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा आणि 21 दिवसांच्या आत अशा प्रकरणांचा निकाल देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. एक आठवड्यात चौकशी आणि दोन आठवड्यांपूर्वी सुनावणी पूर्ण झाली पाहिजे अशी तरतूद विधेयकात आहे. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला पोलिसांनी 'दिशा' नाव दिलं असल्याने या विधेयकालाही दिशा नाव देण्यात आलं.

आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्काऱ्यांना शंभर दिवसांत फाशी? जानेवारीत प्रस्ताव आणणार : सूत्र

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
Maharashtra Live Blog Updates: 20026 ची NEET परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार 
Maharashtra Live Blog Updates: 20026 ची NEET परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार 
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
Pune Crime : कुटुंबीयांची स्वारगेट पोलिसांकडे 'मिसिंग'ची तक्रार अन् हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला; सोबत चिठ्ठीही मिळाली, पुण्यात नेमकं काय घडलं?
कुटुंबीयांची स्वारगेट पोलिसांकडे 'मिसिंग'ची तक्रार अन् हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला; सोबत चिठ्ठीही मिळाली, पुण्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
Embed widget