एक्स्प्लोर

विचार बदलला म्हणून तुमच्यावर मरणआवकळा आली, माणसं बदलल्याने पक्ष मजबूत होणार नाही, रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांना नवी जबाबदारी लवकरच दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावरुन भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी टीका केलीय.

Raosaheb Danve on Aaditya Thackeray :  शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांना नवी जबाबदारी लवकरच दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आदित्य ठाकरे यांना लवकरच कार्याध्यक्षपदाची दिली जाऊ शकते. आदित्य ठाकरे सध्या पक्षात घेत असलेल्या जबाबदाऱ्या, त्यांनी आतापर्यंत लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी केलेलं काम पाहता त्यांना हे पद दिले जाण्याची चर्चा सुरू झाली. यावरुन भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve )  यांनी टीका केली आहे. माणसं बदलून चालणार नाही, तुमचा विचार बदलला म्हणून तुमच्यावर मरणआवकळा आल्याची टीका दानवे यांनी केली. 

 विचार बदलले म्हणूनच तुमची ही हालत झाली 

आदित्य ठाकरे यांना लवकरच कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच मुद्यावरुन रावसाहेब दानवे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. माणसं बदलून चालणार नाही, तुमचा विचार बदलला म्हणून तुमच्यावर मरणआवकळा आल्याची टीका दानवे यांनी केली. विचार बदलले म्हणूनच तुमची ही हालत झाली आहे. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाचा पक्ष आणि उद्धव ठाकरे आले तेव्हाचा पक्ष आणि आता आदित्य ठाकरे येऊ लागलेत. विचाराला तुम्ही मुठमाती दिली आणि माणसं बदलायला लागलात, माणसं तर तुमच्याबरोबर राहिली पाहिजेत असा टोला दानवेंनी आदित्य ठाकरे यांना लगावला. 

माणसे बदलल्याने पक्ष संघटना मजबूत होत नसते

किती नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तुमच्या निवडून आल्या? असा सवाल देखील रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंना केला. माणसे बदलल्याने पक्ष संघटना मजबूत होत नसते. त्यांनी विचार बदलले, विचार बदलायला नको होता असे दानवे यावेळी म्हणाले. 

दोन टर्मचे आमदार ते मंत्री म्हणून काम, आदित्य ठाकरेंना प्रशासकीय अनुभव

ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्षपदाची नवी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या पक्षात सुरू असल्याची माहिती समोर आली. आदित्य ठाकरे यांनी लोकसभा विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या दरम्यान केलेले काम, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली घेतलेल्या जबाबदाऱ्या या सगळ्याचा विचार करता त्यांना हे पद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. सद्यस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते त्यासोबतच युवासेना प्रमुख आहेत. मंत्री म्हणून सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी काम बघितलं आहे. त्यामुळे प्रशासकीय अनुभवसुद्धा आदित्य ठाकरेंना आहे. दोन टर्मचे ते आमदार आहेत. पक्षातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो, शिवाय राज्यभरात पक्ष बांधणीसाठी आणि संघटनात्मक निर्णयांसाठी सुद्धा त्यांचा पुढाकार असतो. निवडणुकांमध्ये प्रचाराची धुरा असू द्या किंवा पक्षाची रणनीती, आदित्य ठाकरे यांचा त्यात सहभाग असतो. उद्धव ठाकरे यांच्यानंतर ते वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडताना पाहायला मिळतात. त्यामुळे ज्या प्रकारे 2003 साली उद्धव ठाकरे यांना शिवसेनेमध्ये कार्याध्यक्षपद दिलं होतं आणि तशाच प्रकारे आदित्य ठाकरे यांना सुद्धा जून महिन्यात पक्षाच्या वर्धापन दिली हे पद दिले जाईल अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या:

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? राजकीय चर्चेमागचं नेमकं कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget