एक्स्प्लोर

विचार बदलला म्हणून तुमच्यावर मरणआवकळा आली, माणसं बदलल्याने पक्ष मजबूत होणार नाही, रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांना नवी जबाबदारी लवकरच दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावरुन भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी टीका केलीय.

Raosaheb Danve on Aaditya Thackeray :  शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांना नवी जबाबदारी लवकरच दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आदित्य ठाकरे यांना लवकरच कार्याध्यक्षपदाची दिली जाऊ शकते. आदित्य ठाकरे सध्या पक्षात घेत असलेल्या जबाबदाऱ्या, त्यांनी आतापर्यंत लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी केलेलं काम पाहता त्यांना हे पद दिले जाण्याची चर्चा सुरू झाली. यावरुन भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve )  यांनी टीका केली आहे. माणसं बदलून चालणार नाही, तुमचा विचार बदलला म्हणून तुमच्यावर मरणआवकळा आल्याची टीका दानवे यांनी केली. 

 विचार बदलले म्हणूनच तुमची ही हालत झाली 

आदित्य ठाकरे यांना लवकरच कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच मुद्यावरुन रावसाहेब दानवे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. माणसं बदलून चालणार नाही, तुमचा विचार बदलला म्हणून तुमच्यावर मरणआवकळा आल्याची टीका दानवे यांनी केली. विचार बदलले म्हणूनच तुमची ही हालत झाली आहे. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाचा पक्ष आणि उद्धव ठाकरे आले तेव्हाचा पक्ष आणि आता आदित्य ठाकरे येऊ लागलेत. विचाराला तुम्ही मुठमाती दिली आणि माणसं बदलायला लागलात, माणसं तर तुमच्याबरोबर राहिली पाहिजेत असा टोला दानवेंनी आदित्य ठाकरे यांना लगावला. 

माणसे बदलल्याने पक्ष संघटना मजबूत होत नसते

किती नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तुमच्या निवडून आल्या? असा सवाल देखील रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंना केला. माणसे बदलल्याने पक्ष संघटना मजबूत होत नसते. त्यांनी विचार बदलले, विचार बदलायला नको होता असे दानवे यावेळी म्हणाले. 

दोन टर्मचे आमदार ते मंत्री म्हणून काम, आदित्य ठाकरेंना प्रशासकीय अनुभव

ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्षपदाची नवी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या पक्षात सुरू असल्याची माहिती समोर आली. आदित्य ठाकरे यांनी लोकसभा विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या दरम्यान केलेले काम, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली घेतलेल्या जबाबदाऱ्या या सगळ्याचा विचार करता त्यांना हे पद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. सद्यस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते त्यासोबतच युवासेना प्रमुख आहेत. मंत्री म्हणून सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी काम बघितलं आहे. त्यामुळे प्रशासकीय अनुभवसुद्धा आदित्य ठाकरेंना आहे. दोन टर्मचे ते आमदार आहेत. पक्षातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो, शिवाय राज्यभरात पक्ष बांधणीसाठी आणि संघटनात्मक निर्णयांसाठी सुद्धा त्यांचा पुढाकार असतो. निवडणुकांमध्ये प्रचाराची धुरा असू द्या किंवा पक्षाची रणनीती, आदित्य ठाकरे यांचा त्यात सहभाग असतो. उद्धव ठाकरे यांच्यानंतर ते वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडताना पाहायला मिळतात. त्यामुळे ज्या प्रकारे 2003 साली उद्धव ठाकरे यांना शिवसेनेमध्ये कार्याध्यक्षपद दिलं होतं आणि तशाच प्रकारे आदित्य ठाकरे यांना सुद्धा जून महिन्यात पक्षाच्या वर्धापन दिली हे पद दिले जाईल अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या:

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? राजकीय चर्चेमागचं नेमकं कारण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
Embed widget