एक्स्प्लोर

त्यांचे घोडे त्यांचा बाजार, आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही, संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना अपयश आले असून आता राज्यसभेसाठी निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना अपयश आले असून आता राज्यसभेसाठी निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.. संजय राऊत यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला.. त्यांचे घोडे त्यांचा बाजार, आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही, असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपावर केला. 

 मुख्यमंत्र्यांसोबत मविआ प्रमुख नेत्यामची बैठक झाली. आम्ही निवडणूक स्वीकारली आहे. आमचं बळ दाखवण्याची आम्हाला पून्हा एकदा संधी मिळाली आहे. आम्हाला बळ दाखवायचं नव्हतं,  पण विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली आहे. याचा  त्यांना पश्चाताप होणार आहे. मविआचे चारही उमेदवार निवडून येतील. कोणीही शहाणपणा करू नये. निवडणूकीत अजिबात घोडेबाजार होणार नाही. त्यांचे घोडे त्यांचा बाजार, आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही, आमचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

केंद्रीय एजन्सी दबाव टाकते पण आम्हीच जिंकणार आहोत.  संजय पवार पहिल्या फेरीत निवडून येतील. या निकालानंतर विरोधकांना पश्चाताप होईल. अजिबात घोडेबाजार होणार नाही ज्याला करायचा त्यांनी घोडेबाजार करावा. विरोधकांनी राज्यसभा निवडणूक लादली. पूर्ण बहुमत आमच्याकडे आहे. त्यांचे घोडे त्यांचा बाजार आम्हाला बाजारात बोलायची गरज नाही. जे काय करायचे ते करा, शेवटी विजय आमचा आहे, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यसभेची सहावी जागा भाजपा जिंकणार आहे. आमदारांच्या सदसदविवेक बुध्दीवर आमचा विश्वास आहे. महाविकास आघाडीने सहावा उमेदवार देवून घोडेबाजार सुरू केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 

मविआची भाजपला काय ऑफर दिली होती?
भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत मविआकडून भाजपला आणखी एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विधान परिषदेसाठी 10 जागांवर निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजपच्या चार जागा निश्चित समजल्या जात आहेत. मविआकडून भाजपला पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 

संख्याबळानुसार काय स्थिती?
विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस  आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13  च्या आसपास मतांची आवश्यकता आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Speech : मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू, असेल हिम्मत तर आत टाकून दाखवा
Local Body Election:राज्यात नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका लांबणीवर,अनगरचीही निवडणूक प्रक्रिया स्थगित
Shahajibapu Patil Sangola News : सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर रात्री छापे
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Buldhana BJP : कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
Jaya Bachchan On Marriage: 'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
Elections 2025 : मुंबईतील 7 हजारांहून अधिक मतदारांचे वॉर्ड बदलले; प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ संपता संपेना, माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक बाब समोर
मुंबईतील 7 हजारांहून अधिक मतदारांचे वॉर्ड बदलले; प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ संपता संपेना, माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक बाब समोर
Gunratna Sadavarte : सक्षम ताटेच्या आई-वडील आणि आचलला संरक्षण द्यावं, कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
सक्षम ताटेच्या कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
Embed widget