एक्स्प्लोर

Raju Shetti : चर्चा रेणुका शुगर्सने ऊसाला दिलेल्या सर्वाधिक दराची, पण राजू शेट्टींनी गणित सोडवून सांगितले! इथेनाॅल दरवाढीवरही बोलले

राज्यात एकरकमी एफआरपीसाठी एल्गार सुरु असताना रेणुका शुगर्सने दिलेल्या दराने चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी याबाबत गणित सोडवून सांगत संभ्रम दूर केला आहे.

Raju Shetti on Renuka Sugars : राज्यात एकरकमी एफआरपीसाठी एल्गार सुरु असतानाच रेणुका शुगर्सने दिलेल्या दराने चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत गणित सोडवून सांगत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी इथेनाॅल दरवाढीवरूनही भूमिका स्पष्ट केली.

राजू शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्र वगळता देशात सर्वच ठिकाणी ऊसाची वाहतूक आणि तोडणी शेतकरी स्वत: करतो. त्यामुळे केंद्र सरकार तोडणी वाहतुकीसह एफआरपी जाहीर करत असते. उत्तर कर्नाटकात महाराष्ट्राप्रमाणे ऊस तोडणी व वाहतूक साखर कारखाने करतात. मात्र, दक्षिण कर्नाटकात विशेष करून मंड्या, शिमोगा भागात शेतकरी स्वत: करतात. त्यामुळे कर्नाटक तोडणी आणि वाहतुकीसह दर जाहीर करण्याची पद्धत आहे. त्यामुळे रेणुका शुगर्सने जाहीर केलेली एफआरपी जास्त वाटत असली, तरी ती जास्त बसत नाही. तोडणी व वाहतूक वजा केल्यास ती 2800 रुपयापर्यंत बसते. 

इथेनाॅल दरवाढीवर राजू शेट्टी काय म्हणाले?

दरम्यान, राजू शेट्टी यांनी इथेनाॅल दरवाढीवर बोलताना सांगितले की, अजून थोडा दर वाढवून दिला असता, तर साखर उद्योगाला दिलासा मिळाला असता. मात्र, आता फक्त इथेनाॅल दरवाढ करून चालणार नाही, तर बदलत्या काळानुसार एफआरपी दर  ठरवणाऱ्या सुत्रामध्येही बदल करण्याची आवश्यकता आहे. 2011 च्या कायद्यानुसार एफआरपी दर ठरवत असताना केवळ साखरेचा दर आणि उपपदार्थ म्हणजेच बगॅस आणि मोलॅसिसचा दर गृहित धरला गेला. पण या ठिकाणी साखरेचे उत्पादन कमी करून थेट ऊसाच्या रसापासून इथेनाॅल किंवा बी हेव्ही मोलॅसिसपासून इथेनाॅल यामुळे मिळणारे उत्पन केवळ कारखान्यांना मिळत आहे. त्यामुळे खासगी कारखाने मालामाल व्हायला लागले आहेत. ऊस उत्पादकांना त्याचा विशेष फायदा होत नाही. त्यामुळे इथेनाॅलचा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने सुत्र आखलं पाहिजे. 

दुसरीकडे रेणुका शुगर्सचे कर्नाटक आणि महाराष्ट्रात साखर कारखाने आहेत. साखर उद्योगातील एक मोठे नाव अशी रेणुका शुगर्सची ओळख आहे. कर्नाटकात पाच तर महाराष्ट्रात दोन साखर कारखाने रेणुका शुगर्सचे आहेत. कर्नाटकात अथणी, हावळगा (गुलबर्गा), कोळवी (गोलक), रायबाग आणि मुनोळी येथे तर महाराष्ट्रात इचलकरंजी आणि पाथरी येथे साखर कारखाने आहेत. कर्नाटकात रेणुका शुगर्सने सगळ्यात कमी दर हावळगा (गुलबर्गा) 3325 इतका जाहीर केला आहे, तर मुनोळी येथील कारखान्याने 3660 इतका जाहीर केला आहे. इचलकरंजी येथील पंचगंगा कारखान्याचा दर सर्वाधिक म्हणजे 3925 इतका आहे. रेणुका शुगर्सच्या दरात तोडणी आणि वाहतूक खर्च समाविष्ट आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget