एक्स्प्लोर

आघाडीत बिघाडी, राजू शेट्टींकडून चौथ्या आघाडीची तयारी!

उसाच्या थकीत एफआरपीचा मुद्दा, कर्जमुक्ती आणि दीड पट हमीभाव विधेयकं मंजूर करून घेण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे स्वाभिमानी, भारिप, शेकापसारख्या पक्षांना काँग्रेस -राष्ट्रवादी गृहीत धरत असल्याची भावना आहे.

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याआधीच काडीमोड होण्याची शक्यता आहे. कारण छोट्या पक्षांना घेऊन स्वाभिमानीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी चौथ्या आघाडीची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची चर्चा फिसकटण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादी विरहीत नवी आघाडी उभी करण्याचे राजू शेट्टी यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हातकणंगले, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, वर्धा, धुळे, नंदुरबार, माढासह अजून 5 ते 6 जिल्ह्यांत उमेदवार स्वाभिमानीच्या संपर्कात आहेत. यामुळे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर विविध पक्षातील नेत्यांशी गाठीभेटी घेत असून ते दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. छोट्या घटकांना एकत्र घेऊन चौथ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू खा. राजू शेट्टींनी सुरु केली असल्याची माहिती आहे. इतर पक्षातील तिकीट कापलेल्या बंडखोर उमेदवारांना स्वाभिमानी पक्षाकडून उमेदवारी देण्याची रणनीती आहे. उसाच्या थकीत एफआरपीचा मुद्दा, कर्जमुक्ती आणि दीड पट हमीभाव विधेयकं मंजूर करून घेण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे स्वाभिमानी, भारिप, शेकापसारख्या पक्षांना काँग्रेस -राष्ट्रवादी गृहीत धरत असल्याची भावना आहे. स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाच्या चर्चेत बुलढाण्याच्या जागेवरून घोडं अडलं आहे, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची राष्ट्रवादीने बुलढण्यातून उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीला मोठा धक्का बसला आहे. या जागेवर प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नावावर स्वाभिमानीकडून शिक्कामोर्तब केलेले आहे. तर वर्ध्यातली जागा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंसाठी सोडण्याची स्वाभिमानीची मागणी होती मात्र काँग्रेसकडून चारुलता टोकसची उमेदवारी जाहीर करून स्वाभिमानीचा पत्ता कट केला आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget