एक्स्प्लोर

अटलजी विरोधकांचं ऐकायचे, मोदी ऐकत नाहीत : राजेंद्र सिंह

शेतकऱ्यांनी आता पाण्यानुसार पीक नियोजन करण्याची गरज राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे. देशात फक्त महाराष्ट्रातच जलसाक्षरता सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं.

अहमदनगर : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना समजावू शकत होतो. ते विरोधकांचे ऐकत असत. मात्र मोदी विरोधकांचे ऐकतच नाहीत, असा गंभीर आरोप ‘जलपुरुष’ राजेंद्र सिंह यांनी केला आहे. अहमदनगरला ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसाक्षरता कार्यशाळेत  बोलत होते. राजेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? “राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पामुळे देशाला मोठा धोका आहे. मात्र यासंदर्भात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना समजावू शकत होतो. ते मोठ्या मनाचे आहेत आणि विरोधकांना ऐकत होते. मात्र विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकतच नाहीत.”, असे राजेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. "गंगा जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत निराशा" गंगा जलशुद्धीकरण प्रकल्पावर बोलताना पंतप्रधानांनी निराशा केल्याचा आरोप राजेंद्र सिंहांनी केला. “गंगा जलशुद्धीकरणासाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र दोन टक्केही खर्च झाले नाही.”, असा आरोप राजेंद्र सिंहांनी केला. तसेच, मोदींमध्ये फार आशा दिसत होती, मात्र मोदींनी निराशा केल्याची खंत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना राजेंद्र सिंह यांनी नदीजोड प्रकल्पावर गंभीर अक्षेप घेत, अनेक राज्यात आणि केंद्रात एकहाती सत्ता असूनही नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी झाली नसल्याचे राजेंद्र सिंहांनी निदर्शनास आणून दिले आहे. सतलज, यमुना आणि व्यास प्रकल्पाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचं त्यांनी नमूद केले. “दोन्ही ठिकाणी एकच सरकार असताना शक्य झाले नाही. त्यामुळे राष्ट्रीय नद्या जोड फार दूर आहे. या प्रकल्पाने देशात अपात्कालीन संकटांचं संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारला थांबावं लागेल.”, असं अवाहन राजेंद्र सिंह यांनी केलं. यावेळी राजेंद्र सिंह यांनी जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केलं आहे. जलयुक्त शिवार देशातील सर्वोत्तम योजना आहे. मात्र ठेकेदारमुक्त अंमलबजावणीची गरज त्यांनी व्यक्त केली. जलयुक्त शिवार तीन वर्षांपूर्वी आदर्श योजना होती. मात्र मध्यंतरी ठेकेदारांचा हस्तक्षेप वाढला होता. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने योजना मार्गावर आल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, शेतकऱ्यांनी आता पाण्यानुसार पीक नियोजन करण्याची गरज राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे. देशात फक्त महाराष्ट्रातच जलसाक्षरता सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
पुण्यात ACB ची मोठी कारवाई, दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रांताधिकाऱ्याला रंगेहात पकडलं 
पुण्यात ACB ची मोठी कारवाई, दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रांताधिकाऱ्याला रंगेहात पकडलं 
धक्कादायक! दोन पोलिसांनी किडनॅप करुन एकाला लुटले, मुंबईच्या जुहूमध्ये धक्कादायक घटना उघडकीस 
धक्कादायक! दोन पोलिसांनी किडनॅप करुन एकाला लुटले, मुंबईच्या जुहूमध्ये धक्कादायक घटना उघडकीस 

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Sushma Andhare On Rupali Chakankar यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी
Mamta Kulkarni on Ashok Kharat : ममता कुलकर्णीचे भोंदू अशोक खरातवर गंभीर आरोप
Vishal Patil Sangli : 2029 ला आम्ही खासदार होऊ याची खात्री नाही, विशाल पाटलांनी व्यक्त केली भीती
Rajkumar Badole Nagpur : 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित मात्र अंमलबजावणीसाठी नियमावली नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market Crash : शेअर बाजारात हाहाकार! 9 लाख कोटी पाण्यात, रिलायन्ससह दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले, कारणे काय?
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी पाण्यात
Balen Shah: अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
Crime : पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!
मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!
Embed widget