एक्स्प्लोर

पराभूत झालेल्या लोकांना आरक्षण देता येईल का? याचा विचार करतोय, विखे पाटलांचा थोरातांना टोला, म्हणाले, ते राजकीय धक्क्यातून सावरले नाहीत

काही लोक राजकीय सदम्यातून सावरलेले नाहीत. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.

Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : काही लोक राजकीय सदम्यातून सावरलेले नाहीत. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर केली. या पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येईल का? असा विचार करतोय, असा खोचक टोला देखील विखे पाटलांनी थोरातांना लगावला. 

स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते, विखेंचा थोरातांना टोला

काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटतं. स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते असा टोला देखील विखे पाटलांनी थोरातांना लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण कोर्टात तुम्ही घालवलं. हे तुमचं पाप असल्याची टीका देखील विखे पाटलांनी केली. आरक्षणाबद्दल तुम्हाला काहीही सोईर सुतक नव्हतं. मराठा आरक्षण मिळू शकत नाही असे तुमचे जाणते राजे सांगायचे असे विखे पाटील म्हणाले. काही लोक राजकीय धक्क्यातून सावरलेले नाहीत.
त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे विखे पाटील म्हणाले. या पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येईल का? असा विचार करतोय असा टोलाही त्यांनी थोरातांना लगावला.

हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका करण्याची आवश्यकता नाही

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी यात्रेवर देखील विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हा सरकारचा शब्द आहे. हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका करण्याची आवश्यकता नाही असे विखे पाटील म्हणाले. हाकेंनी मुक्ताफळे उधळायची बंद करावीत. समाजाचे पुढारपण करायला बंदी नाही, मात्र दुसऱ्या समाजावर टीका करण्याचा अधिकार नाही असेही विख पाटील म्हणाले. 

ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने विरोध केल्याचे एकही उदाहरण नाही

बीडमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराडच्या नावाने घोषणाबाजी केली. यावर बोलतचाना विखे पाटील म्हणाले की, राजकारणात असे जे नवीन पुढारी आहेत त्यांचे समाजासाठी काहीही योगदान नाही. प्रसिद्धीच्या झोतात येऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने विरोध केल्याचे एकही उदाहरण नाही. मराठा समाज जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय, त्यात आक्षेप असण्याचे कारण काय? असा सवाल देखील विखे पाटलांनी केला. अपघाताने पुढारी झालेले लोक अशा पद्धतीने राजकारण करताय. त्यांच्याबाबत काय बोलावे हा प्रश्न असल्याचे विखे पाटील म्हणाले.  काही लोक थिल्लरपणा करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताय. राजकीय व्यवस्थेला हे मान्य, याचे दुःख असल्याचे विखे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलनाची आवश्यकता नाही असे विखे पाटील म्हणाले.  गाव पातळीवर समिती नेमली आहे. जशी माहिती पुढे येईल त्यानुसार दाखले देण्याची कारवाई सुरू होईल असे विखे पाटील म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : मनोज जरांगेंची पहिली मागणी मान्य, उपसमितीच्या बैठकीत मोठा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
Embed widget