एक्स्प्लोर

Prithviraj Chavan : खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने सहा जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणुकीस पुढे येत नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. याची सुरूवात 2011 मध्ये मनमोहन सिंग सरकारने केली होती.

Prithviraj Chavan : महाराष्ट्रात खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने (political protection extortionists) राज्यात सहा जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणूक (Maharashtra investment crisis) करण्यास पुढे येत नाहीत. याचा परिणाम बेरोजगारीवर होत आहे. सध्या महाराष्ट्र राज्य हे खंडणीखोरांचे राज्य झालं आहे आणि त्याला राजाश्रय मिळत असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री तथा राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाण म्हणाले की, एकही मोठा उद्योग (entrepreneurs avoiding Maharashtra) महाराष्ट्रामध्ये येत नाही. उद्योगात एक नंबरवर असलेलं राज्य आज त्या नंबरवर राहिलेलं नाही. त्यामुळे उच्च दर्जाची गुंतवणूक होत नाही आणि त्याने रोजगार मिळत नाही. यावर राज्य सरकारने मुख्यमंत्री कार्यालयात खंडणीखोरांविरूध्द कक्ष स्थापन करून याला पायबंद घातला पाहिजे.  

जातीनिहाय जनगणनेचं स्वागत

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. याची सुरूवात 2011 मध्ये मनमोहन सिंग सरकारने केली होती. त्याची आकडेवारीही उपलब्ध झाली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे ती जाहीर करता आली नाही. यामुळे जातनिहाय जनगणना करण्यास काँग्रेसचा विरोध आहे असा आरोप चुकीचा असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आणि रायगड वगळता अन्य जिल्ह्यात नवे उद्योग उभा राहात नाहीत. याला कारण खंडणीखोरी आहे. खंडणीखोरीला राजाश्रय मिळत असल्याने ही प्रवृत्ती फोफावली आहे. विकसित सहा जिल्ह्यातच राज्याचे 75 टक्के उत्पन्न मिळते, मात्र, अन्य जिल्ह्यांचा विचार व्हायला हवा, यासाठी खंडणीखोरीला  आळा बसला पाहिजे. केवळ रस्ते बांधकाम केले तर प्रगती झाली असे म्हणता येणार  नाही. समृध्दी येणे महत्वाचे आहे. दरडोई उत्पन्नामध्ये राज्य आता अकराव्या नंबरवर पोहचले आहे. राज्य सरकार अडचणीत असून सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षात अंतर्गत बेबनाव आहे. 

आम्ही सर्व विरोधी पक्ष सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत आहोत

लाडकी बहीण या योजनेतून सरकारने पैशाची उधळपट्टी सुरू केली आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सरकार अडचणीत आले, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली. सध्या राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून याचा फटका जनतेला बसत आहे.  काश्मीरमध्ये झालेला अतिरेकी हल्ला हा निंदनीय आहे. याविरूध्द कारवाई करण्यास सर्वच विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. अतिरेकी प्रवृत्तीचा बिमोड करायलाच हवा, यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत आहोत, असे ते म्हणाले. 

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी व्यापार युध्द सुरू केले आहे. याचे गंभीर परिणाम सर्वच देशावर होणार आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र शासनाने करार करत असताना केवळ वाणिज्य मंत्रालयाच्यामार्फत करार न करता कृषी व उद्योग विभागाचाही विचार करायला हवा. जागतिक व्यापार संघटनेचा भारत संस्थापक सदस्य आहे. मात्र ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे या संघटनेचे अस्तित्वच धोक्यात आले असून अमेरिकेशी व्यापार करार करत असताना सरकारने विरोधकांनाही विश्‍वासात घेण्याची गरज आहे. जे करार होणार आहेत, त्याचा कृषी व लघू उद्योगावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण

व्हिडीओ

Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
Malaika Arora Ready For Second Marraige: अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा दुसरं लग्न करणार? म्हणाली, 'यासाठी मी पूर्णपणे तयार...'
अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा दुसरं लग्न करणार? म्हणाली, 'यासाठी मी पूर्णपणे तयार...'
Chhatrapati Sambhaji Nagar Rashid Mamu: चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
Neha Bhasin Decides Never Wants To Have Kids: 43 वर्षांच्या गायिकेचा मूल न होऊ देण्याचा निर्णय, लग्नाच्या नऊ वर्षांनीही ठाम; पती जबाबदार असल्याचंही थेट सांगून टाकलं
43 वर्षांच्या गायिकेचा मूल न होऊ देण्याचा निर्णय, लग्नाच्या नऊ वर्षांनीही ठाम; पतीलाच धरलं जबाबदार
Embed widget