एक्स्प्लोर

पंतप्रधानांना उद्योजक, कलाकार, खेळाडूंना भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटत नाहीत : भारत दिघोळे

उद्योजक, कलाकार, खेळाडू, राजकारणी यांना भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे शेतकऱ्यांना (Farmers) भेटत नसल्याची टीका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे (Bharat Dhigole) यांनी केलं.

Nashik News : देशातील उद्योजक, कलाकार, खेळाडू, राजकारणी यांना भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शेतकऱ्यांना (Farmers) भेटत नसल्याचे वक्तव्य महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नेते भारत दिघोळे (Bharat Dhigole) यांनी केलं. कृषीप्रधान अशी ओळख असलेल्या देशात शेतकऱ्यांनाच आपले प्रश्न मांडण्यासाठी पंतप्रधान वेळ देत नाही. हे शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे. कांद्यावरील निर्यात बंदी कोणत्याही अटी शर्ती शिवाय सुरू करावी. तसेच कांदा निर्यात बंदीपासून मागील नऊ महिन्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी दरातील फरक म्हणून सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही दिघोळे यांनी केली. 

भारत दिघोळेंना सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात केलं स्थानबद्ध

पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यासाठी सभा आयोजित  करण्यात आली होती. सभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांना सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते. पोलिसांनी सकाळपासूनच त्यांना पोलिस ठाण्यात नजरकैद ठेवले आहे. यानंतर दिघोळे यांनी एक प्रेसनोट प्रसिद्ध करत त्यांची भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना वेळ देत नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

रात्रभर दिघोळे यांच्या नाशिकमधील निवासस्थानी पोलिस

मंगळवारी (14 मे रोजी) दुपारी पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी घरी जाऊन भारत दिघोळे यांना कलम149 अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. काल रात्रभर दिघोळे यांच्या नाशिकमधील निवासस्थानी पोलिस निगराणी ठेवण्यात आली होती. तर आज सकाळीच एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे हवालदार भगवान शिंदे, रोशन गायकवाड, प्रकाश उंबरकर यांनी भारत दिघोळे यांना घरातून ताब्यात घेतले. तसेच त्यांना सिन्नर पोलिस ठाण्यात स्थानबध्द केले. दिवसभर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या निगराणीत ठेवण्यात आले.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा संपल्यानंतर भारत दिघोळे यांना सोडून देण्यात आले आहे. 

राज्यात कांद्याच्या दराच्या मुद्द्यावरुन शेतकरी आक्रमक 

सध्या राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. यावेळी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी वेळ द्यावा. कांद्याच्या मुद्यावर तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या सभेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.  

महत्वाच्या बातम्या:

PM Modi: हिंदू-मुस्लीम भेदभाव केला तर मी सार्वजनिक जीवनात राहण्याच्या पात्रतेचा उरणार नाही, 'त्या' वक्तव्यावर पंतप्रधान मोदींचं स्पष्टीकरण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
Embed widget