एक्स्प्लोर

प्रकाश आंबेडकर म्हणातात, कॉंग्रेसने पुन्हा हात पुढे केल्यास विचार करू, पण...

काँग्रेसचे नेते निवडणूक काळात देखील हॉलिडेच्या मूडमध्ये आहेत, अशा पक्षाचं मग कल्याणचं आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

सांगली : केंद्राचे कायदे न पाळणे ही देशाशी बगावत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच माझ्या दृष्टीने काँग्रेस संपलेली आहे, आजही काँग्रेसचे नेते निवडणूक काळात हॉलिडेच्या मूडमध्ये आहेत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सांगली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे .

काँग्रेसचे नेते निवडणूक काळात देखील हॉलिडेच्या मूडमध्ये

काँग्रेस सोबत जाण्याबाबत आपण अनुकूल होतो, मात्र काँग्रेसने जागावाटपाच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही. मात्र जर कॉंग्रेसकडून पुन्हा हात पुढे आल्यास विचारू करू,पण माझ्या दृष्टीने काँग्रेस आता संपली आहे. आजही काँग्रेसचे नेते निवडणूक काळात देखील हॉलिडेच्या मूडमध्ये आहेत, अशा पक्षाचं मग कल्याणच आहे.

तर केंद्र सरकार कधीही 356कलम लावू शकते

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राचे आदेश पाळण्यात येत नसल्याच्या प्रश्नावरून बोलताना आंबेडकर म्हणाले, केंद्राचे जे कायदे किंवा आदेश असतील ते राज्य सरकारला पाळणे संविधानानुसार गरजेचे आहे. पण राज्य सरकार जर आदेश धुडकावून लावत असतील तर हा विद्रोह आहे. जर राज्य सरकार बगावत करत असेल तर केंद्र सरकार घटनेतील तरतुदीनुसार केंद्र 356 कलम लावू शकते.

पदवीधर आणि शिक्षक निवडणूका आतापर्यंत विना अजेंडा लढवल्या जात होत्या. विरोधी पक्षातील उमेदवाराचा पदवीधरांशी आणि शिक्षकाशी आतापर्यंत कसलाही संबंध आला नाही. आताही सगळे उमेदवार कारखानादार आहेत. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल व्हावा यासाठी आम्ही या निवडणूका लढवत आहोत. आरक्षित वर्गातील मतदार आमच्यासोबत राहील ही अपेक्षा आहे असे आंबडेकर म्हणाले.

राज्यात व्यवसायिक शिक्षण संस्थेमध्ये असणाऱ्या आरक्षणात सर्वच सरकारने बदल केले आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास आरक्षण समूहात असलेल्या सव्वा लाख विद्यार्थ्यांना हक्काच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे,असा आरोप आंबडेकर यांनी केला. 70 वर्षांमध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्याला कारण सरकारचा नाकर्तेपणा आहे.

राज्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयामध्ये फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. मुस्लिम समाजाला मात्र मिळाली नाही, पण धर्मनिरपेक्षचा डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केले नाही,असा आरोप आंबडेकर यांनी केला आहे.

विधानसभा मध्ये जर आम्ही गेलो तर मुस्लिम, मराठा आरक्षणचा प्रश्न मार्गी लावू असे म्हणत मराठा आरक्षणाच्या विरोधात श्रीमंत मराठाच उभा आहे. जो श्रीमंत मराठा आहे त्या वर्गालाच गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे वाटेत, असेही आंबेडकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget