एक्स्प्लोर

Maharashtra Gram Panchayat Election | निमगाव : स्थापनेपासून ग्रामपंचायत निवडणूक न पाहिलेलं गाव

निमगाव, सोलापुराच्या माढा तालुक्यातील गाव जिथे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून एकही निवडणूक झालेली नाही. 66 वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत गावातून एकही केस पोलिसात गेलेली नाही.

पंढरपूर : सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरु आहे. परंतु एक गाव असंही आहे जिथे ग्रामपंचायत निवडणूक झालेली नाही. 1955 मध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून इथे तब्बल 66 वर्षे निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. या गावाचं नाव आहे निमगाव, जे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आहे.

1955 सालापासून 2021 पर्यंत या गावाने आजवर एकही ग्रामपंचायत निवडणूक पाहिलेली नाही. आजवर या गावाने तालुक्याला तीन आमदार आणि पाच सभापती दिले आहेत. माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे हे निमगाव. या गावाने आजवर एकही ग्रामपंचायत निवडणूक पाहिलेली नाही. निमगाव इथे 1955 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली आणि तेव्हापासून जवळपास 66 वर्षे या गावात कधीही ग्रामपंचायत निवडणूक न होता, आजवर बिनविरोध निवडीची प्रक्रिया अतिशय एकोप्याने चालत आलेली आहे. आज तिसऱ्या पिढीतही ही परंपरा अशाच रितीने पाळली जाते हे विशेष.

या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 66 वर्षात या गावातून एकही प्रकरणपोलीस स्टेशनपर्यंत गेलेलं नाही. साधारण साडेतीन हजार लोकवस्तीचे हे गाव काही वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत होते . दुसऱ्या भाषेत बोलायचे झाल्यास इथे तुळशीच्या लग्नालाही ऊस मिळणे मुश्किल असताना आता या गावातून तब्बल 1 लाख टनापेक्षा जास्त ऊस साखर कारखान्याला जातो. याशिवाय 300 एकरावरील केळी आणि रोज दहा हजार लिटर दूध संकलित करणाऱ्या या गावाचे वार्षिक उत्पन्न 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. मजुरीला जाणाऱ्या या गावात आज घरटी दुचाकी आणि चार चाकीगाडी असल्याने येथील मजूरही थेट गाडी उडवत मजुरीला जातात. हे सर्व शक्य झालंय गावाच्या एकीने. या गावात शेतीला पाणी पुरवठा करणारा साठवण तलाव आहे, ज्यामुळे गाव 100 टक्के बागायत झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरचे RO पाणी प्रत्येक घराला मिळते. गावात थेट बालगोपालापासून यूपीएससी आणि एमपीएससीपर्यंत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय आहे. संपूर्ण गावाला ग्रामपंचायतीकडून वायफाय सुविधा, भुयारी गटार योजना, पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटचे रस्ते, दवाखाना, शाळा, ज्युनियर कॉलेज सगळ्या सोयी ग्रामपंचायत पुरवते. फक्त तुम्हाला या गावात आल्यावर एकही हॉटेल अथवा पण टपरी मात्र शोधून मिळणार नाही. कारण या गावात या सुविधा गेल्या 66 वर्षात कधी गावकऱ्यांनी येऊच दिल्या नाहीत.

Maharashtra Gram Panchayat Election | निमगाव : स्थापनेपासून ग्रामपंचायत निवडणूक न पाहिलेलं गाव

ग्रामीण विकासाचा पाया अशी ओळख असलेल्या ग्रामपंचायत आदर्श कारभाराचे एक जिवंत उदाहरण म्हणून निमगावने आपली ओळख बनवली आहे ते गावाच्या एकीमधून. वास्तविक निवडणूक म्हणजे गावगाड्यातील जिवंतपणा असे सांगितले जाते. मात्र निवडणूक आणि त्यातून होणारे विसंवाद, बेबनाव आणि पातळी घसरत चाललेल्या राजकारणापेक्षा एकोप्याने जपलेला आपलेपणा याचीच गोडी निमगाव ग्रामस्थांना आहे . म्हणूनच तिसऱ्या पिढीतही बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा आजही कायम आहे. गावात दोन आमदार असले तरी गावाचा कारभार गावातील ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्याने चालतो. सर्व जाती धर्मातील ज्येष्ठ मंडळी निवडणुकीपूर्वी एकत्र बसतात आणि प्रत्येक प्रभागासाठी उमेदवार ठरवतात. या मंडळींनी ठरवलेल्या उमेदवारालाही माहित नसते की यंदा आपण सरपंच किंवा सदस्य होणार आहे. मात्र एकदा या ज्येष्ठांनी उमेदवार यादी जाहीर केला की ते ग्रामस्थ जाऊन अर्ज भरतात आणि पहिल्याच दिवशी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचा निकाल लागतो.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणापासून जवळ वसलेल माढा तालुक्यातील निमगाव हे गाव. या गावाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दिवंगत आमदार विठ्ठलभाऊ शिंदे यांनी 1955 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तीच परंपरा आज 2021 मध्ये सुद्धा आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे यांनी कायम ठेवली आहे. यामुळेच शेतीसोबत या गावातील प्रत्येक घरातील एक माणूस नोकरी करतो. एक दुधाचा किंवा दुसरा व्यवसाय करतो तर उरलेला शेतीत उत्पन्न घेतो. यामुळेच या गावात कधी वादविवाद तंटे होत नाहीत आणि झाले तर गावातील ज्येष्ठ मंडळींच्या तोडग्यानंतर सर्वच वाद गावातच मिटल्याने येथील ग्रामस्थांनी कधीही पोलीस स्टेशनची पायरी चढलेली नाही .

निमागावची वैशिष्ट्ये

- 1955 साली स्थापनेपासून गेली 66 वर्षे ग्रामपंचायत बिनविरोधची परंपरा अखंड सुरु

- गावाच्या एकीमुळे पाण्याचा थेंब नसलेल्या गावात आज 50 कोटींची उलाढाल होते

- गावात वादच होत नसल्याने गेल्या 6 वर्षात पोलीस स्टेशनला एकही केसच कधी गेली नाही

- गावात एकही हॉटेल अथवा टपरी नाही, त्यामुळे येथे प्रत्येकजण कामात गुंतलेला असतो

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Uday Samant on Eknath Shinde: बच्चू कडूंप्रमाणे माझीही मागणी, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं; उदय सामंतही थेट बोलले, महायुतीत ठिणगी?
बच्चू कडूंप्रमाणे माझीही मागणी, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं; उदय सामंतही थेट बोलले, महायुतीत ठिणगी?

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांचा राज्यसभा उमेदवारीचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
Mumbai Best Bus Accident: बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; टॅक्सी आडव्या पडल्या, दुचाकी चक्काचूर, दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
Embed widget