एक्स्प्लोर

पूरग्रस्तांना मदतीचा निर्णय आधीच घेतलाय, राजू शेट्टींनी टोकाची भूमिका घ्यायची गरज नव्हती, NCPकडून प्रतिक्रिया

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil)यांनी माजी खासदार राजू शेट्टी (Raju SHetti)यांच्या परिक्रमा आणि जलसमाधी घेण्याच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला आहे.

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या परिक्रमा आणि जलसमाधी घेण्याच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या निकषांप्रमाणे अधिकची मदत देण्याचा निर्णय 27 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला असताना राजू शेट्टींनी  जलसमाधी घेण्यासारखी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. राजू शेट्टींची आम्हाला गरज आहे. आजही ते महाविकास आघाडी सरकारचे घटक आहेत. आंदोलन करण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर त्याना 27 ऑगस्ट रोजी झालेल्या निर्णयाची माहिती दिली असती असेही पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, सांगली, कोल्हापूर आणि अन्य ठिकाणच्या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 27 ऑगस्टलाच 2019 च्या निकषाप्रमाणेच वाढीव मदत देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः हा निर्णय घोषित देखील केलाय. त्यामुळे वाढीव मदत देण्याचा निर्णय झाला असताना यासाठी परिक्रमा किंवा आंदोलने करण्याची गरज नव्हती. आता अलीकडे ज्या भागात पूर येऊन गेला तेथील नुकसानीचा आकडा आला की राज्यातील सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच आहे.  त्यामुळे राजू शेट्टींनी या प्रश्नांवरून जलसमाधी घेण्यासारखी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही, असं पाटील म्हणाले. 

मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही; पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय : राजू शेट्टी

त्यांनी म्हटलं की,  राजू शेट्टींची आम्हाला गरज आहे. आजही ते  महाविकास आघाडी सरकारचे घटक आहेत. आंदोलन करण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर त्याना 27 ऑगस्ट रोजी झालेल्या निर्णयाची माहिती दिली असती असेही जयंत पाटील म्हणाले. तसेच केंद्र सरकारने यावर्षी आलेला पूर आणि अतिवृष्टी बाबत कोणतीही मदत केलेली नाही.राज्य सरकारने या संकटाने झालेल्या नुकसानीची माहिती केंद्र सरकारला दिलेली आहे. केंद्राकडूनही आम्हला मदतीची अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. 

जयंत पाटील म्हणाले की, आता मराठवाडा, खानदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी झालीय. या नुकसानीच्या बाबतीत केंद्र सरकारकडे राज्य सरकारने संपर्क केलाय. केंद्राने देखील लवकर निधी द्यावा. केंद्राने अजून काही मदत दिली नाही. एक वर्षांपूर्वी केंद्राने जी मदतीची घोषणा केली होती ती मदत देखील अजून मिळाली नाही. केंद्र सरकारचा निधी येऊ अथवा न येऊ पण राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात केंद्र सरकार देखील लवकर सहभागी होईल अशी अपेक्षा आहे, असे जयंत पाटील यांनी आश्वासन दिले आहे.

मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही- राजू शेट्टी

मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, जिथं महाविकास आघाडी सरकार चुकतंय तिथे मी सरकारविरोधात ठामपणाने बोलणार. पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, मी पॅकेज देणारा माणूस नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण, पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाली नाही, असे म्हणत पूरग्रस्तांसाठी इस्लामपूरमध्ये काढलेल्या आक्रोश मोर्चामध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय.  महाविकास आघाडी निर्माण करणाऱ्यापैकी मी एक आहे, मी आजही महाविकास आघाडीमध्ये आहे असेही शेट्टी म्हणालेत. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांची फसवणूक केली आहे. तसेच पूरग्रस्तांच्या पुनर्वसन बाबतीत सरकार आता व्यापार करत आहेत, अशी टीकाही शेट्टी यांनी केली आहे. पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी आम्ही जलसमाधी घेऊ, पण सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget