एक्स्प्लोर

Jayant Patil : इव्हेंट कमी करा, बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐका, जयंत पाटलांचा सरकारला टोला

सरकारनं मराठवाड्यात दुष्काळ जाहीर केला पाहिजे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.

Jayant Patil on State Govt : मराठवाड्यामध्ये (Marathwada) दुष्काळी परिस्थितीमुळे खरीपाची पिकं हातातून गेली आहेत. त्यामुळं सरकारनं मराठवाड्यात दुष्काळ जाहीर केला पाहिजे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं. सरकारनं इव्हेंट कमी करावा आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकाव्यात असेही जयंत पाटील म्हणाले.

मराठवाड्यासाठी सरकार काय जाहीर करणार 

सरकारनं शेतकऱ्यांना मदत सुरु केली पाहिजे. पण सरकार दुसऱ्यात कामात व्यस्त आहे. बडेजाव सुरु आहे, सरकार किती मदत करणार की नुसत्या घोषणा करणार हे बघायला हवे. मराठवाड्यात आज बैठक आहे. मराठवाड्यासाठी सरकार काय जाहीर करणार हे बघायला पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळं शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? इतका गंभीर प्रश्न असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येचं प्रमाण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात 186 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पाहायला हवं असेही जयंत पाटील म्हणाले. इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. 

आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण करा

दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं स्वरुप दिलं आहे. अति उत्साहात सरकार सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्यांचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो असे जयंत पाटील म्हणाले.

मराठवाड्यात सरकारनं पाण्याचे टँकर जाहीर करावेत

मराठवाड्यात सरकारनं पाण्याचे टँकर आज जाहीर करणे आवश्यक आहे. धरणामध्ये पाणी साठा शिल्लक आहे असे वाटत नाही. सरकारनं लवकर जागं व्हावं. सरकार आपल्या दारी हे कार्यक्रम सोडून दुष्काळ आपल्या दारी आधी बघायला पाहिजे इव्हेंट कमी केला पाहिजे, बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत असे जयंत पाटील म्हणाले.  

बेरोजगारी ही मोठी समस्या 

आज बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. सरकारी नोकऱ्या पण कमी करणार असे जाहीर झाले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आता केल्या जाणार आहेत. त्यासाठी 9 कंपन्या नेमल्या आहेत. आरक्षणाचा विषय तर तसाच आहे. आरक्षणाचा आग्रह करणाऱ्या तरुणाला कळले की नोकऱ्या कंत्राटीवर भरणार आहेत, मग आरक्षणाचा काय उपयोग? असे जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात तरुणाची कुचंबणा होणार आहे. गुंतवणूक देखील येत नाहीत, सरकार त्यासाठी काही करत नसल्याचे पाटील म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh On Vote Chori: मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: 'चौकशी केली तर एक लाख कोटींचा घोटाळा बाहेर येईल', Vijay Wadettiwar यांचा गंभीर आरोप
Vijay Wadettiwar On Pune Land : ईडी, सीबीआय झोपलेत का? त्यांनी तातडीने लक्ष घालावं - वडेट्टीवार
Chandrashekhar Bawankule : माझ्याकडे कुठलीही तक्रार आली नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
Pune Land Scam: 'चौकशीचे आदेश दिलेत', पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर CM फडणवीसांची थेट भूमिका
Uddhav Thackeray : शक्तिपीठ म्हणजे शेतकऱ्यांच्या उरावरुन जाणारा महामार्ग, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh On Vote Chori: मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Suraj Chavan, Ankita Walawalkar, Bigg Boss Marathi 5: सूरज चव्हाणची लगीनघाई! अंकिताताईच्या घरी पार पडलं केळवण; गुलिगत स्टारची होणारी बायको पाहिली का?
सूरज चव्हाणची लगीनघाई! अंकिताताईच्या घरी पार पडलं केळवण; गुलिगत स्टारची होणारी बायको पाहिली का?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Parth Pawar: पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
Embed widget