एक्स्प्लोर

“पोटावर आणि छतावर येतं, तेव्हा गरीब माणूस सहन करू शकत नाही.”; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला सूचक इशारा

Jitendra Awhad : रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना सात दिवसात घरे रिकामे करण्यासंदर्भात नोटिसा धाडल्या आहेत. नोटिसा हाती पडताच नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.

Jitendra Awhad : रेल्वेच्या जागांवरील घरांना रेल्वेकडून सात दिवसात घरे रिकामी करण्याच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण पूर्वेकडील आनंद वाडी परिसरात रहिवाशांची भेट घेतली. यावेळी आव्हाड यांनी चार वर्षांपूर्वी कळवा येथे रेल्वे रुळावर झालेल्या आंदोलनाची आठवण करून दिली. रेल्वेच्या नोटिसाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, 'जेव्हा सामुदायिक शक्ती रस्त्यावर उतरते तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. उद्या जर पाच लाख लोकांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरायचे ठरवलं, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारसमोर अवघड परिस्थिती होईल. पाच लाख ही संख्या कमी नाही, जेव्हा पोटावर आणि छतावर येतं, तेव्हा गरीब माणूस हे सहन करू शकत नाही. ' एकप्रकारे जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला सूचक इशारा दिला .

रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना सात दिवसात घरे रिकामे करण्यासंदर्भात नोटिसा धाडल्या आहेत. नोटिसा हाती पडताच नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्वमधील आनंदवाडी परिसरात रेल्वेच्या जागेत असलेल्या घरांना देखील नोटिसा धाडल्या असून 60 वर्षांपासून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इतक्या वर्ष रेल्वे झोपली होती का?  आधी पुनर्वसन करा, मग घरे घ्या अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी या झोपडपट्टी धारकांची भेट घेत घेतली होती. आज राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरातील रहिवाशांची भेट घेतली, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी या रहिवाशांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन येथील नागरिकांना दिलं. 

रेल्वेच्या या कारवाईबाबत बोलताना मंत्री आव्हाड यांनी जेव्हा सामुदायिक शक्ती रस्त्यावर उतरते तेव्हा निर्णय घ्यावा लागतो, उद्या जर पाच लाख लोकांनी एकत्रित पणे रस्त्यावर उतरायचे ठरवलं ,तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार समोर अवघड परिस्थिती होईल, असा सूचक इशारा दिला. पुढे बोलताना त्यांनी हा लढा फक्त इथलाच नाही, झोपडपट्टी ही गरिबीची निशाणी आहे, कुणाला हौस नाही झोपड्यामध्ये राहायची. आर्थिक दुर्बलता, गावी नसलेली शेती, काम ही परिस्थिती याना इथे घेवून आली आहे. कोरोना काळात हाताला काम नाही, त्यात या नोटिसा दिल्यात. केंद्र सरकारने गरिबांचा विचार करावा. त्यांना न्याय द्यायचा विचार करावा ,आणि प्रश्न कायमचा सोडवावा. राज्य सरकारचा एस आर ए चा कायदा आहे, तो जशाच्या तसा उचलून या जमिनिवर टाकावा. आम्ही याना स्कीम देऊ. 50 वर्षापासून जी घरे  केंद्र सरकारच्या जागावर आहेत, त्यांना संरक्षित करावं. केंद्र सरकारने कायदा करावा, आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा आम्ही कायदा केला. 1995 पर्यंतच्या सगळ्या झोपडपट्टी सरंक्षित होत्या त्या आता 2011 पर्यंत आणल्यात. या ठिकाणच्या  झोपड्या तर 50 ते 60 वर्षा पूर्वीच्या आहेत, त्यांना संरक्षण मिळालच पाहिजे अशी भूमिका स्पष्ट केली. सरकार म्हणजे लोकाभिमुख राज्य आहे. त्याची भूमिका लोकाभिमुख असली पाहिजे लोकविरोधी भूमिका घेऊन चालणार नाही, असा सल्ला देखील आव्हाड यांनी केंद्र सरकारला दिला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime : भाजप आमदाराच्या भावाला अपघाताचा बनाव रचत संपवण्याचा कट, बच्चू कडूंवर गंभीर आरोप; अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये गुन्हा दाखल
भाजप आमदाराच्या भावाला अपघाताचा बनाव रचत संपवण्याचा कट, बच्चू कडूंवर गंभीर आरोप; अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये गुन्हा दाखल
Anjali Damania On Ashok Kharat Case: रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स काढले, मंत्र्यांचीही नावं घेतली!
रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स काढले, मंत्र्यांचीही नावं घेतली!
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ
Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ

व्हिडीओ

Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर 'आप'ने कारवाई का केली?
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report
Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report
Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!
इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!
“जो डर गया, समझो मर गया” आम्ही डोळ्यात डोळे घालून सरकारला भिडत असताना, केजरीवाल जेलमध्ये असताना देशाबाहेर लपला होता, तुम्ही मोदी भाजपला एक प्रश्न विचारला नाही; आपने राघव चड्ढांची 'साॅफ्ट' कुंडली बाहेर काढली
“जो डर गया, समझो मर गया” आम्ही डोळ्यात डोळे घालून सरकारला भिडत असताना, केजरीवाल जेलमध्ये असताना देशाबाहेर लपला होता, तुम्ही मोदी भाजपला एक प्रश्न विचारला नाही; आपने राघव चड्ढांची 'साॅफ्ट' कुंडली बाहेर काढली
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
रामदास स्वामी शिवरायांचे गुरु, बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकचा प्रभाव, किशोरी पेडणेकर काय काय म्हणाल्या?
रामदास स्वामी शिवरायांचे गुरु, बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकचा प्रभाव, किशोरी पेडणेकर काय काय म्हणाल्या?
Gold Silver Rates:युद्धाच्या अनिश्चितेनं सोने चांदीला उतरती कळा! सोनं 3 हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही मोठी घसरण; आजचे दर किती ?
युद्धाच्या अनिश्चितेनं सोने चांदीला उतरती कळा! सोनं 3 हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही मोठी घसरण; आजचे दर किती ?
इराणला 'अश्मयुगा'त नेण्यापूर्वी ट्रम्पनी युद्ध सुरु असतानाच अमेरिकन लष्करप्रमुखांसह तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तडकाफडकी घरी पाठवलं; नेमकं असं काय घडलं?
इराणला 'अश्मयुगा'त नेण्यापूर्वी ट्रम्पनी युद्ध सुरु असतानाच अमेरिकन लष्करप्रमुखांसह तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तडकाफडकी घरी पाठवलं; नेमकं असं काय घडलं?
Anjangaon Statue Controversy: माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?
माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?
Ashok Kharat Case Nashik Crime News: Silent मोड, काही प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांनी सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती
Silent मोड, प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांनी सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती
Embed widget