एक्स्प्लोर

“पोटावर आणि छतावर येतं, तेव्हा गरीब माणूस सहन करू शकत नाही.”; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला सूचक इशारा

Jitendra Awhad : रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना सात दिवसात घरे रिकामे करण्यासंदर्भात नोटिसा धाडल्या आहेत. नोटिसा हाती पडताच नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.

Jitendra Awhad : रेल्वेच्या जागांवरील घरांना रेल्वेकडून सात दिवसात घरे रिकामी करण्याच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण पूर्वेकडील आनंद वाडी परिसरात रहिवाशांची भेट घेतली. यावेळी आव्हाड यांनी चार वर्षांपूर्वी कळवा येथे रेल्वे रुळावर झालेल्या आंदोलनाची आठवण करून दिली. रेल्वेच्या नोटिसाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, 'जेव्हा सामुदायिक शक्ती रस्त्यावर उतरते तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. उद्या जर पाच लाख लोकांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरायचे ठरवलं, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारसमोर अवघड परिस्थिती होईल. पाच लाख ही संख्या कमी नाही, जेव्हा पोटावर आणि छतावर येतं, तेव्हा गरीब माणूस हे सहन करू शकत नाही. ' एकप्रकारे जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला सूचक इशारा दिला .

रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना सात दिवसात घरे रिकामे करण्यासंदर्भात नोटिसा धाडल्या आहेत. नोटिसा हाती पडताच नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्वमधील आनंदवाडी परिसरात रेल्वेच्या जागेत असलेल्या घरांना देखील नोटिसा धाडल्या असून 60 वर्षांपासून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इतक्या वर्ष रेल्वे झोपली होती का?  आधी पुनर्वसन करा, मग घरे घ्या अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी या झोपडपट्टी धारकांची भेट घेत घेतली होती. आज राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरातील रहिवाशांची भेट घेतली, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी या रहिवाशांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन येथील नागरिकांना दिलं. 

रेल्वेच्या या कारवाईबाबत बोलताना मंत्री आव्हाड यांनी जेव्हा सामुदायिक शक्ती रस्त्यावर उतरते तेव्हा निर्णय घ्यावा लागतो, उद्या जर पाच लाख लोकांनी एकत्रित पणे रस्त्यावर उतरायचे ठरवलं ,तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार समोर अवघड परिस्थिती होईल, असा सूचक इशारा दिला. पुढे बोलताना त्यांनी हा लढा फक्त इथलाच नाही, झोपडपट्टी ही गरिबीची निशाणी आहे, कुणाला हौस नाही झोपड्यामध्ये राहायची. आर्थिक दुर्बलता, गावी नसलेली शेती, काम ही परिस्थिती याना इथे घेवून आली आहे. कोरोना काळात हाताला काम नाही, त्यात या नोटिसा दिल्यात. केंद्र सरकारने गरिबांचा विचार करावा. त्यांना न्याय द्यायचा विचार करावा ,आणि प्रश्न कायमचा सोडवावा. राज्य सरकारचा एस आर ए चा कायदा आहे, तो जशाच्या तसा उचलून या जमिनिवर टाकावा. आम्ही याना स्कीम देऊ. 50 वर्षापासून जी घरे  केंद्र सरकारच्या जागावर आहेत, त्यांना संरक्षित करावं. केंद्र सरकारने कायदा करावा, आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा आम्ही कायदा केला. 1995 पर्यंतच्या सगळ्या झोपडपट्टी सरंक्षित होत्या त्या आता 2011 पर्यंत आणल्यात. या ठिकाणच्या  झोपड्या तर 50 ते 60 वर्षा पूर्वीच्या आहेत, त्यांना संरक्षण मिळालच पाहिजे अशी भूमिका स्पष्ट केली. सरकार म्हणजे लोकाभिमुख राज्य आहे. त्याची भूमिका लोकाभिमुख असली पाहिजे लोकविरोधी भूमिका घेऊन चालणार नाही, असा सल्ला देखील आव्हाड यांनी केंद्र सरकारला दिला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: अशोक खरातची ईडीकडूनही चौकशी केली जाण्याची शक्यता
Maharashtra Live Blog Updates: अशोक खरातची ईडीकडूनही चौकशी केली जाण्याची शक्यता
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले
अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले
Nagpur Accident: अपघाताचा महामार्ग! नागपूर जिल्ह्यातील काटोल- वरुड सिमेंट महामार्गाला मोठ्या भेगा, 10 दिवसात दोन दुकाचीस्वरांचा अंत, एक वर्षात 30 अपघातांची नोंद
अपघाताचा महामार्ग! नागपूर जिल्ह्यातील काटोल- वरुड सिमेंट महामार्गाला मोठ्या भेगा, 10 दिवसात दोन दुकाचीस्वरांचा अंत, एक वर्षात 30 अपघातांची नोंद
Tushar Doshi Satara Zilla Parishad Election 2026: सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना भोवलं; तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना भोवलं; तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Embed widget