एक्स्प्लोर

Jitendra Awhad : 'औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं', जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं, असं जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) म्हटलं आहे. या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे

Jitendra Awhad News: राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj) डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते हे सांगताना आव्हाडांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं' असं म्हणाले. जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विधानसभेत संभाजी महाराजांबद्दल (Sambhaji maharaj) केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरु झाला. या वादावर बोलताना ठाण्यातील पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांनी स्वतःच वाद ओढवून घेतला.

संभाजी महाराज एका विशिष्ट धर्मांतरास बाहेर पडले अशी एकही नोंद नाही

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं, असं आव्हाड म्हणाले.  जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांच्या बद्दलचा वाद निष्कारण काढला गेलाय. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर बसले.  मराठा व्यापक संकल्पना होती. रयतेच्या राज्याचे वारसदार होते संभाजी महाराज . यामुळे ते एका विशिष्ट धर्मांतरास बाहेर पडले अशी एकही नोंद नाही. इतिहासकारांनी त्यांच्या बद्दल चांगले लिहून ठेवले आहे. स्त्रीप्रधान संस्कृतीला मानणारे संभाजी महाराज मोठे अभ्यासक होते. कुठल्या इतिहासकाराने त्यांना धर्मवीर म्हणले नाही. जे शिवाजी महाराजांनी केले तेच पुढे संभाजी महाराजांनी केले, असं आव्हाड म्हणाले, 

आव्हाडांनी म्हटलं की, सहा सुनेरी पानं यांत जे काही लिहिलंय ते वाचून पुन्हा वाद नाही निर्माण करायचा. सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल “नाकारतां पुत्र, त्यांना मदिराचे व्यसन होते” असं लिहून ठेवलं.  गोळवलकर यांनी “खंडोज्जी बल्लाळ यांच्या स्त्रीयांवर संभाजी महाराजांची वाईट नजर होती” असं लिहून ठेवलंय, असंही आव्हाडांनी सांगितलं. 

आव्हाडांनी म्हटलं की,संभाजी महाराजांची माहिती कोणी दिली यांचे देखील पुरावे आहेत.  अजित पवार यांना म्हणायचे वेगळे होते पण त्यांचा टोन वेगळा होता.  मी जे सांगतोय ते सत्य अभ्यासू सांगतोय.  भाजपाने जे आंदोलन केले म्हणून हे सगळं बाहेर घेवून आलोय.  अजित पवार संभाजी महाराजांच्या विरोधात काहीच बोलले नाही.  महापुरुषांना विशिष्ट धर्माचे लेबल लावायचे आणि बाजारात विकायला आणायचे. मराठ्यांबद्दल इतकं वाईट लिहिलंय त्या बद्दल आतापर्यंत का कोणी बोलले नाही, असंही आव्हाड म्हणाले.

नंतर सारवासारव करत आव्हाड म्हणतात, औरंगजेब क्रूरच होता...

पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन आव्हाडांवर टीका झाल्यानंतर त्यांनी आपलं वक्तव्यावर सारवासारव केली.  निष्कारण धर्माची जोड द्यायची हे बरोबर नाही. तुळापूरला औरंगजेब कधीच गेला नव्हता.  औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासांत लिहून ठेवलंय. त्याने भावाला वडिलांना मारले आणि गादीवर बसला. औरंगजेब क्रूरच होताच, असं आव्हाड म्हणाले.   क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांना कुठे मारलं यांचे पुरावे नाहीत. स्वतःच्या राज्य रचने करता औरंगजेब कोणालाही सोडत नव्हता. पण त्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही, असंही ते म्हणाले. 

Video: नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड- पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget