एक्स्प्लोर

Jitendra Awhad : 'औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं', जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं, असं जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) म्हटलं आहे. या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे

Jitendra Awhad News: राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj) डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते हे सांगताना आव्हाडांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं' असं म्हणाले. जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विधानसभेत संभाजी महाराजांबद्दल (Sambhaji maharaj) केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरु झाला. या वादावर बोलताना ठाण्यातील पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांनी स्वतःच वाद ओढवून घेतला.

संभाजी महाराज एका विशिष्ट धर्मांतरास बाहेर पडले अशी एकही नोंद नाही

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं, असं आव्हाड म्हणाले.  जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांच्या बद्दलचा वाद निष्कारण काढला गेलाय. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर बसले.  मराठा व्यापक संकल्पना होती. रयतेच्या राज्याचे वारसदार होते संभाजी महाराज . यामुळे ते एका विशिष्ट धर्मांतरास बाहेर पडले अशी एकही नोंद नाही. इतिहासकारांनी त्यांच्या बद्दल चांगले लिहून ठेवले आहे. स्त्रीप्रधान संस्कृतीला मानणारे संभाजी महाराज मोठे अभ्यासक होते. कुठल्या इतिहासकाराने त्यांना धर्मवीर म्हणले नाही. जे शिवाजी महाराजांनी केले तेच पुढे संभाजी महाराजांनी केले, असं आव्हाड म्हणाले, 

आव्हाडांनी म्हटलं की, सहा सुनेरी पानं यांत जे काही लिहिलंय ते वाचून पुन्हा वाद नाही निर्माण करायचा. सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल “नाकारतां पुत्र, त्यांना मदिराचे व्यसन होते” असं लिहून ठेवलं.  गोळवलकर यांनी “खंडोज्जी बल्लाळ यांच्या स्त्रीयांवर संभाजी महाराजांची वाईट नजर होती” असं लिहून ठेवलंय, असंही आव्हाडांनी सांगितलं. 

आव्हाडांनी म्हटलं की,संभाजी महाराजांची माहिती कोणी दिली यांचे देखील पुरावे आहेत.  अजित पवार यांना म्हणायचे वेगळे होते पण त्यांचा टोन वेगळा होता.  मी जे सांगतोय ते सत्य अभ्यासू सांगतोय.  भाजपाने जे आंदोलन केले म्हणून हे सगळं बाहेर घेवून आलोय.  अजित पवार संभाजी महाराजांच्या विरोधात काहीच बोलले नाही.  महापुरुषांना विशिष्ट धर्माचे लेबल लावायचे आणि बाजारात विकायला आणायचे. मराठ्यांबद्दल इतकं वाईट लिहिलंय त्या बद्दल आतापर्यंत का कोणी बोलले नाही, असंही आव्हाड म्हणाले.

नंतर सारवासारव करत आव्हाड म्हणतात, औरंगजेब क्रूरच होता...

पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन आव्हाडांवर टीका झाल्यानंतर त्यांनी आपलं वक्तव्यावर सारवासारव केली.  निष्कारण धर्माची जोड द्यायची हे बरोबर नाही. तुळापूरला औरंगजेब कधीच गेला नव्हता.  औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासांत लिहून ठेवलंय. त्याने भावाला वडिलांना मारले आणि गादीवर बसला. औरंगजेब क्रूरच होताच, असं आव्हाड म्हणाले.   क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांना कुठे मारलं यांचे पुरावे नाहीत. स्वतःच्या राज्य रचने करता औरंगजेब कोणालाही सोडत नव्हता. पण त्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही, असंही ते म्हणाले. 

Video: नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड- पाहा व्हिडीओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget