एक्स्प्लोर

जोवर ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोवर निवडणुका नकोत : जयंत पाटील

Jayant Patil On Obc Reservation : ओबीसी आरक्षणावरुन सध्या वातावरण तापलं असताना आता राष्ट्रवादीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जयंत पाटील यांनी यावर महत्वाचं भाष्य केलं आहे.

Jayant Patil On Obc Reservation : ओबीसी आरक्षणावरुन सध्या वातावरण तापलं असताना आता राष्ट्रवादीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले की, आमच्या पक्षाचा निर्णय आहे जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका नकोत असा आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणचा निर्णय सध्या चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हा प्रश्न पुन्हा तयार झाला. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचे दोन्ही निर्णय सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर बदलले. याच्यामागे काय होतं. कोर्टानं दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय अडवण्याची पद्धत सुरु आहे. जाणीवपूर्वक कोर्टात जायचं आणि नवे प्रश्न तयार करायचे. या सरकारला काम करायला अडथळे निर्माण करायचे. विशेषता ओबीसी समाजात गैरसमज पसरवायचे. सध्या महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्यामध्ये केवळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे, असा आरोप त्यांनी केला. 

ते म्हणाले की,  ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यावरच निवडणुका व्हाव्यात हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. सुप्रीम कोर्टात हा निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी दिल्लीत यासंदर्भात बैठका घेतल्या. सुप्रीम कोर्टाला मुद्दा पटवून देण्यासाठी आणखी काय करता येईल याचा मार्ग ते शोधत आहेत. ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस तेवढीच संवेदनशील आणि आग्रही आहे. मराठा आरक्षणासाठीही राष्ट्रवादी संवेदनशील आणि आग्रही आहे. मुस्लिम आरक्षणासाठीही आमचा आग्रह आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 

देशात केंद्र सरकारच्या विरोधी कुणी बोललं तर हे नवाब मलिक यांनी सांगितलेले पाहुणे आपल्या घरी येतात. तुम्ही सतत बोलत आहात तर पाहुणे येतात. काही नाही बोलले तर पाहुणे दुर्लक्ष करतात. तुम्ही त्यांच्यात जाऊन बसलात तर ते तुमचं स्वागत करतात, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला. 

दरोडेखोर देखील एखाद्या घरावर दरोडा घातल्यावर पुन्हा त्या घरी येत नाही. मात्र अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयनं सात वेळा धाडी टाकल्या. महाराष्ट्रात आणि देशात याविरोधात कुणीतरी वाचा फोडायला हवी होती. त्याला नवाब मलिकांनी वाचा फोडली. विरोधकांनाही सन्मानानं वागवायचं असतं. विधायक कामात वादविवाद होऊ शकतो मात्र वैयक्तिक टार्गेट केलं जातं आहे हे दुर्दैव आहे, असं जयंत पाटील म्हणाले. प्रसारमाध्यमांवर देखील करडी नजर असते, असंही ते म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
अपर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, राजकीय वर्तुळात खळबळ
अपर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, राजकीय वर्तुळात खळबळ
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
अपर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, राजकीय वर्तुळात खळबळ
अपर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, राजकीय वर्तुळात खळबळ
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
Embed widget