एक्स्प्लोर

Nashik Corona | मालेगावमध्ये 12 तासात 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

मालेगावमधील कोरोनाचा प्रसार तातडीने रोखण गरजेचं असल्याने मालेगावसाठी स्थानिक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची निर्मिती केली आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. मालेगावमध्ये आणखी 13 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 12 तासात मालेगावमध्ये 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. काल रात्री 12 वाजता 5 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, त्यानंतर पुन्हा 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या 18 नव्या रूग्णांमुळे मालेगावमधील कोरोना बाधितांची संख्या 27 झाली आहे. त्यापैकी मालेगावमधील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. आता नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 32 झाली आहे. नाशिक शहरात तीन, निफाड आणि चंदवडमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण आढळला आहे. निफाडमधील एक रूग्ण पूर्णपणे बरा झाल्यामुळे त्याला होम क्वॉरंटाईनमध्ये पाठवण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रात मालेगाव हे कोरोनाचे केंद्र ठरत आहे. या परिसरात अतिशय दाटीवाटीने नागरी वस्ती आहे. या भागात आतापर्यंत 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खाजगी रुग्णालयात शिफ्ट करणार आहेत. याआधी ज्या रुग्णांना कोरोना झाला त्यांच्या निकटवर्तीयांचा नवीन रुग्णात समावेश मालेगावात कोरोनाची लागण झपाट्यानं होत असल्याने आरोग्य विभागाची अतिरिक्त टीम नेमण्याची तयारी केली आहे. मालेगावमध्ये जरी रुग्णसंख्या अचानकपणे वाढली असली तरी ते वाढलेले सर्व लोक हे मूळ बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील किंवा अत्यंत जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येणे जवळपास निश्चित होते. या सर्व लोकांना मूळ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आधीच वेगळे करण्यात आलेले आहे. ते इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन आहेत. अजूनही लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले व्यवस्थित पाळला तर या आजाराचा संसर्ग बाहेर होण्याचे टाळणे शक्य आहे, असं नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं आहे. मालेगाव हे यंत्रमागाचे शहर असल्याने येथील अनेकांची फुफ्फुसाची क्षमता तुलनेने कमी आहे. तसेच क्षय रुग्णांची संख्या अधिक आहे. या कारणास्तव मालेगावात करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला. अशा परिस्थितीत नागरिकांनी सामाजिक अंतरासह सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमभंग करू नये. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील 15 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. प्राप्त परिस्थितीत सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची निर्मिती   मालेगावमधील कोरोनाचा प्रसार तातडीने रोखण गरजेचं असल्याने मालेगावसाठी स्थानिक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची निर्मिती केली आहे. मालेगावची विशिष्ट भौगोलिक परिस्थिती आणि दाटीवाटीचा परिसर लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची या सेंटरच्या व्यवस्थापक व प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इमर्जन्सी सेंटरची सर्व जबाबदारी आशिया यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही अधिकार देखील त्यांना देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Embed widget