एक्स्प्लोर

Nashik Corona Update | मालेगाव पाठोपाठ नाशिक कोरोनाचा हॉटस्पॉट

नाशिक शहरात शनिवारी दुपारपर्यंत 339 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 116 पूर्णपणे बरे झाले असले तरी देखील 209 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात 80 प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत.

नाशिक : मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरही आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यात आटोक्यात असणारे नाशिक आता धोक्याची घंटा ठरू लागल आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, एवढाच काय तो दिलासा. त्यामुळे एकीकडे सर्व व्यवहार सुरळीत सुरू करायचे आणि दुसरीकडे वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवायचे असे दुहेरी आव्हान प्रशासनासमोर आहे.

नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातून कोरोनाचा शिरकाव झाला. पहिला रुग्ण लासलगावमध्ये आढळला आणि तिथून पुढे एकापाठोपाठ एक रुग्णसंख्या वाढत गेली. मालेगावमध्ये तर कहरच झाला. दिवसाकाठी सरासरी 20 ते 25 रुग्ण आढळत गेले आणि नियंत्रणात असणारी परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जाऊ लागली. आता तीच परिस्थिती नाशिकची होत आहे. नाशिक शहरात शनिवारी दुपारपर्यंत 339 रुग्ण आढळून होते. त्यापैकी 116 पूर्णपणे बरे झाले असले तरी देखील 209 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात 80 प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत.

वडाळा गाव, खोडेनगर पेठरोड असे नवीन हॉटस्पॉट तयार होत आहे. वडाळा गाव नाशिक शहरातील सर्वात मोठे प्रतिबंधित क्षेत्र आहे. 4 हजार 700 घरांमध्ये साधारणत 25 हजार नागरिक राहत असून या भागात आतपर्यंत 21 रुग्ण आढळून आले आहेत. गावाच्या चारही बाजूने पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. मात्र तरीही गावात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीला 1484 जणांना कोरोनाची लागण झाली असून 89 जणांचा मृत्यू झालाय, तर 973 कोरोनामुक्त झालेत.

जिल्ह्याबरोबर नाशिक शहरातील अर्थव्यवस्था सुरळीत सुरू व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. बहुतांश नियम शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या वाढणार हे खुद्द प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत. त्यामुळेच राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार शहरात सम आणि विषम या तत्वावर व्यवसायिकांनी आपली दुकाने सुरू करावी, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी सर्व प्रमुख व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलावून त्यांना विश्वासातही घेतले. मात्र त्या नियमांच कुठेच पालन होत नाहीये. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने सुरू असून रस्त्यावर नागरिकांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे जोपर्यंत नागरिकांची संयमी साथ मिळत नाही, तोपर्यंत प्रशासनाचे सर्व प्रयत्न तोकडे ठरणार असून कोरोनाचा लढा आव्हानात्मक ठरणार आहे. त्यासाठी नागरिकांनी दिलेल्या सवलीतींचा लाभ घ्यावा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहान प्रशासनाकडून केल जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget