सप्तशृंग गडावर निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सप्तशृंगगड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Nashik Accident : नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सप्तशृंगगड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरुन इनोव्हा कार (एम.एच.15 बी.एन.0555) हजारो फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. इनोव्हा कारमध्ये पिंपळगाव चिंचखेड येथील भाविक होते.
सप्तशृंगी गडावरुन इनोव्हा कार दरीत कोसळली
सप्तशृंगगड दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. सप्तशृंगी गडावरुन इनोव्हा कार दरीत कोसळली आहे. गणपती पॉइंटजवळ हा अपघात घडला आहे. संरक्षण कठडा तोडून कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला आहे. कारमधील पाच जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. 1000 फूट खोल दरी असल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरील दुरुस्तीच्या उपाययोजना नसल्याने अपघात झाल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे.
अपघातातील मृतांची नावे
१ ) कीर्ती पटेल
२ ) रसीला पटेल
३ ) विठ्ठल पटेल
४ ) लता पटेल
५ ) पचन पटेल
६ ) मणिबेन पटेल
कारचालकाचे नियंत्रण सुटून कार सुमारे 800 ते 1000 फूट दरीत कोसळली
गणपती घाटाच्या पुढे पिंपळगाव येथील इनोव्हा कंपनीची कारचालकाचे अचानक नियंत्रण सुटून सुमारे 800 ते 1000 फूट दरीत कोसळल्याने कारमधील एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिंपळगाव येथील पटेल कुटुंबीय हे सप्तशृंग गडावर दर्शन घेऊन परतत असतांना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके, स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल असल्याने बचाव पथकाला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. अंगावर काटा आणणारे हे दृश्य होते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणा, घाटरस्त्यावर योग्य दुरुस्ती नसल्याने, तसेच सुरक्षितेच्या कुठल्याही उपाययोजना नसल्याने अशा अपघाताच्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी यावेळी केला. पोलिसांनी मृतांच्या ओळखीची प्रक्रिया सुरू केली असून मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पुढे पाठवले आहे. या घटनेने पिंपळगाव व सप्तशृंगगड परिसरात शोककळा पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडली असून सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी
सप्तशृंग गड ग्रामपंचायत उपसरपंच संदिप बेनके व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























