![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
राष्ट्रवादीच्या दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची नावे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार, पाच नेत्यांची कागदपत्रेही तयार : रणजितसिंह निंबाळकर
सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार याना क्लिन चिट दिल्याचा आभास निर्माण केला जात असला तरी जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असल्याचे रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.
![राष्ट्रवादीच्या दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची नावे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार, पाच नेत्यांची कागदपत्रेही तयार : रणजितसिंह निंबाळकर Names of ten big corrupt leaders of NCP will be given to central investigation agencies Says Ranjitsinh Naik Nimbalkar राष्ट्रवादीच्या दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची नावे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार, पाच नेत्यांची कागदपत्रेही तयार : रणजितसिंह निंबाळकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/ba4cbe56cd73302a26e9840ac5081b91166082733957289_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकारणे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार असून यातील पाच जणांची कागदपत्रे तयार झाल्याचा गौप्यस्फोट माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांनी केला आहे. आत्तापर्यंत किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज अशा पद्धतीचे आरोप करत होते. आता भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर हे देखील मैदानात उतरले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष सर्वात भ्रष्ट असल्याची टोलेबाजी त्यांनी केली आहे.
आपण तक्रार देणार असणाऱ्या दहा पैकी पाच राष्ट्रवादी बड्या नेत्यांच्या पुराव्याच्या फाईल तयार झाल्याने त्या ईडी आणि सीबीआयडीकडे देणार असल्याचे निंबाळकर यांनी या वेळी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा राज्यात ईडीची वक्रदृष्टी राष्ट्रवादीकडे वळणार याचे संकेत मिळू लागले आहेत. खासदार निंबाळकर हे टेंभूर्णी येथे मतदारसंघात बोलत होते .यावेळी त्यांचे सोबत भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील , उमेश बोबडे, संतोष पाटील आणि इतर पदाधिकारी होते.
सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार याना क्लिन चिट दिल्याचा आभास निर्माण केला जात असला तरी जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. पवार यांच्या लवासा प्रकरणावर देखील सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारल्याचे सांगताना या जमिनी देताना जलसंपदा मंत्री कोण होता? जमिनी कशा दिल्या असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जलसंपदा मंत्रालयात अनेक प्रकरणात घोटाळे झाले असल्याचे आरोप असल्याने या चौकशा तर होणारच असा टोलाही निंबाळकर यांनी लगावला.
फलटण येथील एक बडा नेता कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाला जेलमध्ये जाण्यापेक्षा आता भाजपात गेलेले बरे असे सांगत सुटला असला तरी कृष्ण खोरे महामंडळात अनेक फाईलवर साह्य केल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत असा टोला निंबाळकर यांनी लगावला. आता भाजपमध्ये आला तरी या प्रकरणांच्या चौकशी होणार असा इशारा निंबाळकर यांनी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील उजनीचे पाणी बारामतीकडे वळविण्याचा निर्णय आता कायमचा रद्द केला जाणार असून नीरेचे पाणी देखील पुन्हा दुष्काळी सांगोला आणि सोलापूरला परत मिळविले जाणार असल्याचे रणजित निंबाळकर यांनी सांगितले . माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन वर्षात जवळपास 85 हजार कोटींची कामे पूर्ण केल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
Mohit Kamboj Tweet : राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार, ट्वीटमधून मोहित कंबोज यांचा कोणाकडे इशारा?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)