एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. पाच दिवसात निर्णय नाही झाला तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी राजभवनावर मोर्चा काढला होता. राजभवनावर पोहचण्याअगोदरच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. आमदार बच्चू कडू यांच्यासह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरक्षेचं कारण देत मोर्चा काढण्यापूर्वीच पोलिसांनी बच्चू कडू यांना नोटीस पाठवली होती. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र राजभवनावर पोहचण्यापूर्वीच मोर्चा अडवून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अडवल्यानंतर बच्चू कडू  यांनी आयनॉक्स थिएटर मित्तल टॉवरसमोर आंदोलन केले. मोर्चात शेतकरी मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. सोयाबीन, सडलेले कांदे रस्त्यावर फेकून  शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पाच दिवसात निर्णय नाही झाला तर आम्ही  पुढच्या वेळी काहीही न सांगता थेट राजभवनावरच पोहचणार असल्याचे 'एबीपी माझा'शी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले.  सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणार नाही का ? त्यांना वाऱ्यावर सोडणार का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला. राज्यपालांनी राज्यात किमान दौरा करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना 25000 रूपयाची मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले. Bacchu Kadu Protest | ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या आंदोलनानंतर आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात | मुंबई | ABP Majha स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, राज्यात सरकार नाही मग शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार? राज्यपालांकडे काही हक्कच नसतील तर त्यांनी सुत्रं हातात कशाला घ्यायची ? राज्यपालांनी फक्त राजभवनात बसून राहायचं का ? ते काय स्वर्गातून आले आहेत का? राज्यपालांनी राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहणं गरजेचं आहे. राज्यपालांना प्रशासकीय अधिकार आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे अपेक्षित आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चावर दडपशाही करण्यात आली. किसान सभा या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे.शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी विविध पक्षांचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केवळ फोटो सेशन करत आहेत. पर्यटनाला यावं अशा थाटात दौरे करत आहेत. सत्तेच्या राजकारणात शेतकऱ्यांना मदत करण्याचे विसरून जात आहेत. राजकीय नेत्यांच्या या संतापजनक दिखाऊपणाचाही किसान सभा निषेध व्यक्त करत आहे. मदत जाहीर करण्यात आणखी दिरंगाई झाल्यास सर्व शेतकरी संघटनांना सोबत घेत राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा किसान सभेने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: SRPF कौस्तुभ सांगळेने लोकभवनात स्वत:ला संपवलं; आता धक्कादायक कारण आलं समोर, पोलीसही चक्रावले!
SRPF कौस्तुभ सांगळेने लोकभवनात स्वत:ला संपवलं; आता धक्कादायक कारण आलं समोर, पोलीसही चक्रावले!
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
Vasai Virar Rain Flood News: वसई-विरारमध्ये महापुराचा कहर; आजही जनजीवन विस्कळीत, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान, 48 तासांत काय काय घडलं?
वसई-विरारमध्ये महापुराचा कहर; आजही जनजीवन विस्कळीत, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान, 48 तासांत काय काय घडलं?

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
Sharad Pawar NCP and BJP Talks: शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
Embed widget