एक्स्प्लोर

राज्य सरकारच्या दुर्लक्षाचा फटका MPSC उत्तीर्ण झालेल्या 420 भावी अधिकाऱ्यांना, आठ महिने उलटले तरीही अजून  नियुक्तीच्या प्रतिक्षेत

एमपीएससीचा भोंगळ कारभार हा विद्यार्थ्यांसाठी काही नवीन नाही. त्यावर आता राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यसेवेचा निकाल लागून आठ महिने झाले तरी अद्याप 420 अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली नाही. 

मुंबई : एकीकडे एमपीएससीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात सातत्य नाही, परीक्षा वारंवार काहीतरी फुटकळ कारणं देऊन पुढे ढकलल्या जात आहेत तर दुसरीकडे राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल लागून आज आठ महिने झाली तरीही उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा वर्ग एक आणि वर्ग दोनच्या 420 भावी अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात येत नाही. अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसमोर स्पर्धा परीक्षांची अनिश्चिती आणि पास झालं तरीही नियुक्ती मिळणार नाही अशी काहीशी अवस्था उभी राहिली आहे.

नुकतंच एमपीएससीच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचं पहायला मिळालंय. परीक्षा अवघ्या तीन-चार दिवसांवर असताना कोरोनाचे कारण देऊन एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यावर पुण्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. हा निर्णय नेमका कोणी घेतला हे कळायला मार्ग नव्हतं, राज्य सरकार आणि एमपीएससी एकमेकांकडे बोट दाखवतं होतं. विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेता राज्य सरकारने पुढच्या आठवड्यात परीक्षा घ्यायचा निर्णय जाहीर केला. पण वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे रस्त्यावर उतरावं लागलं हे दुर्दैवी आहे. 

2019 साली राज्यसेवेची परीक्षा झाली आणि तिचा निकाल हा जून 2020 साली लागला. त्यावेळी जवळपास 420 यशवंत विद्यार्थांची यादी जाहीर करण्यात आली. नियमाप्रमाणे दरवर्षी  एक ऑगस्टला या बॅचला नियुक्ती देऊन ट्रेनिंगसाठी पाठवणं अपेक्षित होतं. पण कोरोनामुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला. 4 मे 2020 साली राज्य शासनाच्या वतीनं एक जीआर काढण्यात आला आणि त्यात कोरोना काळात कोणालाही नियुक्ती देण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं. नंतरच्या काळात 9 सप्टेंबरला राज्यातील मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आणि या पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न टांगणीवर पडला.

आता मराठा आरक्षणावर आणण्यात आलेल्या या स्थगितीचं कारण सांगून या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात येत नाही. या बॅचचा निकाल हा जून 2020 मध्ये लागला, आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला. त्यामुळे पास झालेल्या विद्यार्थांना नियुक्ती द्यायला कोणती अडचण होती असा प्रश्न या विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येतोय.

विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार

एकदा निकाल लागल्यानंतर एमपीएससीची भूमिका संपते. पास झालेल्या विद्यार्थांना नियुक्ती देण्याचं काम राज्य सरकारच्या हातात आहे. मग राज्य सरकार जाणूनबुजून या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळतंय का? या विद्यार्थ्यांना नियुक्ती न देऊन राज्य सरकार त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतंय का असा प्रश्नही या विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय. 

राज्य सरकारने आपल्या अधिकारातून या विद्यार्थांना नियुक्त्या दिल्या पाहिजेत, तसं करण्याचा पूर्ण अधिकार राज्य सरकारला असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलंय कारण जून 2020 मध्ये लागलेल्या निकालाची सर्व प्रक्रिया ही आधीच पार पडली आहे आणि त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतरच्या इतर जाहिरातीतील मराठा आरक्षणावर गदा आली आहे, ते प्रलंबित आहे.  राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षाचा फटका या एक-दोन नव्हे तर तब्बल  420 यशवंत विद्यार्थांना त्याचा फटका बसला आहे. यातल्या काहीजणांना आर्थिक परिस्थितीमुळे पडेल ती कामं करावी लागत आहेत, काहींनी शेतात राबायला सुरुवात केली आहे. 

पास होऊनही नियुक्त्या नसल्याने मुलांची झालेली ही अवस्था अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांना कसं काय प्रेरणा देणार? अनेक वर्षे अभ्यास करायचा आणि पास झाल्यानंतर राज्यसरकार आणि एमपीएससीच्या चुकीच्या धोरणांना बळी पडायचं हे आताच नाही या आधीही झालंय. एमपीएससी यातून कोणताही धडा घेत नाही हे विशेष. 

एमपीएससीचा कारभारच निव्वळ भोंगळ असल्याचं वारंवार दिसून येतंय. कुणाचं पायपुसणं कुणाच्या पायाखाली नाही अशी अवस्था एमपीएससीची झालीय. त्यात एमपीएससी सदस्यांच्या नियुक्त्या नाहीत आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचं कारण नेहमीच दिलं जातंय. 

MPSC Exam Date 2021 | एमपीएससीची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमध्ये मोबाईलवरुन पत्नीला 'ट्रिपल तलाक'; पती म्हणाला, 'आज से तू हलाल नही, हराम हो गई', गुन्हा दाखल
नाशिकमध्ये मोबाईलवरुन पत्नीला 'ट्रिपल तलाक'; पती म्हणाला, 'आज से तू हलाल नही, हराम हो गई', गुन्हा दाखल
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
Vasai Crime News: लग्नसोहळ्यानंतर मंडपातच वादाचे हिंसक रूप; मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल, दोन्ही गटांकडून गुन्हे दाखल, वसईत नेमकं काय घडलं?
लग्नसोहळ्यानंतर मंडपातच वादाचे हिंसक रूप; मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल, दोन्ही गटांकडून गुन्हे दाखल, वसईत नेमकं काय घडलं?
Nitin Gadkari : देशात पाण्याची नव्हे तर नियोजनाचा अभाव; हायवे ग्रीड, पॉवर ग्रीड प्रमाणेच 'वॉटर ग्रीड'ची गरज; नितीन गडकरींनी संगितला पाणी टंचाईवर उपाय, म्हणाले...
देशात पाण्याची नव्हे तर नियोजनाचा अभाव; हायवे ग्रीड, पॉवर ग्रीड प्रमाणेच 'वॉटर ग्रीड'ची गरज; नितीन गडकरींनी संगितला पाणी टंचाईवर उपाय, म्हणाले...

व्हिडीओ

Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thalapathy Vijay Viral Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
RCB vs MI IPL 2026 : मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमकही झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमक झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
Embed widget