एक्स्प्लोर

Monsoon : मान्सूनबाबात वैज्ञानिक दृष्टीकोन महत्त्वाचा, सध्या परिस्थिती काय?  पाहा काय म्हणतायेत तज्ज्ञ

सध्या हवामानाचा अंदाज काय आहे. परतीचा पावसाला कधी सुरुवात होणार यासंदर्भातील माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.

Monsoon : राज्यात सध्या काही भागात पाऊस (Rain) सुरु आहे, तर काही ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, वायव्य राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याचा अंदाज हवामान विभागानं (Department of Meteorology) वर्तवला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हवामान अभ्यासकांचा सुळसुळाट झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळं शेतकरी तसेच सामान्य नागरिक संभ्रमात आहेत. एका कथित हवामान अभ्यासकानं मान्सूनचा मुक्काम जानेवारी महिन्यापर्यंत वाढणार असल्याचा दावा केला होता. मात्र, नेमका पावसाचा अंदाज काय? कधीपर्यंत पाऊस पडणार, परतीचा पावसाला कधी सुरुवात होणार यासंदर्भात एबीपी माझानं काही अनुभवी हवामान तज्ज्ञांशी संपर्क सधला आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात....

मान्सूनबाबत काही जणांचे खोटे दावे, त्याला वैज्ञानिक बेस नाही : कृष्णानंद होसाळीकर

दरम्यान, हवामानाच्या अंदाजाबाबात पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  तथाकथित स्वयं दावा केलेल्या तज्ञांकडून पूर्णपणे दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी ही माहिती टाळली पाहिजे. मान्सूनचा मुक्काम जानेवारी महिन्यापर्यंत वाढणार असल्याचे दावे खोटे असल्याचे होसाळीकरांनी म्हटलं आहे. त्याला कोणताही  वैज्ञानिक बेस नसल्याचे होसाळीकरांनी म्हटलं आहे. दुर्दैवाने हे वारंवार घडत आहे. ते माझ्या महाराष्ट्रासाठी धोकादायक असल्याचं होसाळीकरांनी म्हटलं आहे. 

राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात

आजपासून वायव्य राजस्थान तसेच गुजरातच्या कच्छमदून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. सरासरी तारीख 17 सप्टेंबर होती मात्र, तीन दिवस उशीरा सुरुवात झाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या कंडिशन पूऱ्ण केल्या आहेत. यामध्ये  पहिले म्हणजे वाऱ्याची चक्रावात स्थिती, दुसरी गोष्टी हवेतील आर्द्रता खूप कमी होते आणि तिसरी म्हणजे सलग पाच दिवस तिथे पाऊस पडत नाही. अशी स्थिती झाली तर तिथून परतीचा पाऊस सुरु झाल्याचे म्हटले जाते. दरम्यान, पुढचे दोन दिवस महाराष्ट्रातील विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे होसाळीकर म्हणाले. पुढचे दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज आहे. 

'या' तीन अवस्था पूर्ण झाल्यास परतीचा पाऊस सुरु होतो

महाराष्ट्रातील परतीच्या पावसासंदर्भात देखील होसाळीकर यांना विचारण्यात आले यावेळी त्यानी सांगितले की, वाऱ्याची चक्रावात स्थिती, हवेतील आर्द्रता खूप कमी होणे आणि सलग पाच दिवस तिथे पाऊस पडत नाही तर परतीच्या पाऊस सुरु झाल्याचे म्हटलं जाते. ही स्थिती जेव्हा सुरु होईल त्यावेळी राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात होईल असे होसाळीकर म्हणाले. आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज असल्याचे होसाळीकरांनी सांगितले.

सध्याची भौगोलिक स्थिती पाहता परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण : उदय देवळाणकर

मान्सूनच्या परतीच्या अंदाजाबाबात एबीपी माझानं कृषी अभ्यासक आणि हवामन तज्ज्ञ उदय देवळाणकर (Uday Deolankar) यांच्याशी संपर्क सधाला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. चालू वर्ष हे ला निना वर्ष आहे. आता ला निना म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असले. ला निना म्हणजे जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरुपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्यालाच ला निना असे संबोधले जाते. या ला निना वर्षात अधून-मधून पावसाची शक्यता असते. मात्र, सध्याच्या भौगोलिक स्थिती पाहता परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण झालं आहे. पावसाळा जास्त दिवस लांबेल असं म्हणणं संयुक्तिकरित्या वाटत नसल्याचेही देवळाणकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : मुंबईसह अकोल्यात पावसाची जोरदार हजेरी, आज विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget