एक्स्प्लोर

नवीन सरकार येईपर्यंत आचारसंहिता कायम, दुष्काळग्रस्तांना मदत कशी करणार? राज्य सरकारपुढे प्रश्न

Model Code Of Conduct : मतमोजणी झाल्यानंतरही आचारसंहिता कायम राहणार असून त्यामुळे दुष्काळग्रस्तांना मदत कशी करायची असा प्रश्न राज्य सरकारसमोर उभा आहे. 

मुंबई: जोपर्यंत नवीन लोकसभा स्थापन होत नाही तोपर्यंत आचारसंहितेमध्ये (Model Code Of Conduct) शिथिलता दिली जाणार नाही अशी महत्वपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. 4 जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर लोकसभा स्थापन होईल आणि त्यानंतर आचारसंहितेमध्ये शिथिलता दिली जाईल असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक काही घोषणा किंवा निर्णय राज्य सरकारला घ्यायचे असल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेण बंधनकारक राहणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत कशी करणार असा प्रश्न आता राज्य सरकारसमोर आहे. 

देशात सात टप्प्यात मतदान होत असून सातव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून निकालानंतर आचारसंहिता हटवण्यात येईल अशी चर्चा होती. पण त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. देशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचं आयोगाने सांगितलं आहे. तसेच या काळात राज्य सरकारला कोणतेही मोठे निर्णय घेता येणार नाहीत, जर काही अत्यावश्यक निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे. 

दुष्काळग्रस्त भागाला मदत जाहीर करण्यास अडचण

देशात 4 जून रोजी निकाल लागल्यानंतर पुढील सरकार सत्तेत येण्यासाठी किमान 15 दिवस किंवा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. जून महिना त्यामध्ये पूर्ण जाऊ शकतो. एकीकडे राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे तर दुसरीकडे आचारसंहिता लागू असल्याने त्यावर कोणताही महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त नागरिकांना राज्य सरकार कशा पद्धतीने मदत करणार हे पाहावं लागेल. 

देशातील लोकसभेच्या निवडणुकीचे टप्पे आणि झालेले मतदान 

पहिला टप्पा 
एकूण जागा  - 102मतदारसंघ
एकूण मतदान - 66.14 टक्के

दुसरा टप्पा
एकूण जागा  - 88 मतदारसंघ
एकूण मतदान - 66.71 टक्के

तिसरा टप्पा
एकूण जागा  - 94 मतदारसंघ
एकूण मतदान - 65.68 टक्के

चौथा टप्पा
एकूण जागा  - 86 मतदारसंघ
एकूण मतदान - 69.16 टक्के

पाचवा टप्पा
एकूण जागा  - 49 मतदारसंघ
एकूण मतदान - 62.20 टक्के

सहावा टप्पा 
एकूण जागा - 58 मतदारसंघ
एकूण मतदान - 63.37 टक्के

निवडणूक आचारसंहितेचा नियम काय सांगतो? 

देशात लोकसभा निवडणुका जाहीर होताच, निवडणूक आचारसंहिता लागू होते. तर, नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत ती लागू राहते. या काळात विद्यमान सरकार कोणत्याही प्रकारची नवी घोषणा करू शकत नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. निवडणूक निकालानंतर काही दिवसांनी नवीन सरकार सत्तेत येईल. 

ही बातमी वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget