![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
मोठी बातमी : आशिष शेलार शिवतीर्थवर, राज ठाकरेंची भेट, कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाबाबत निर्णय काय?
विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 26 जून रोजी मतदान होत आहे. तर, 1 जुलै रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.
![मोठी बातमी : आशिष शेलार शिवतीर्थवर, राज ठाकरेंची भेट, कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाबाबत निर्णय काय? Big news: Ashish Shelar on Shivtirth, Raj Thackeray's visit, what is the decision on Konkan and Mumbai graduate constituencies? मोठी बातमी : आशिष शेलार शिवतीर्थवर, राज ठाकरेंची भेट, कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाबाबत निर्णय काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/d4585661e85c89be449614ca87d19fca17170769386741002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगत झाल्यानंतर विधानपरिषद (Vidhanparishad) निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे, निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोप, राजी-नाराजीपासून काही वेळासाठी दूर झालेली राजकीय मंडळी पुन्हा विधानपरिषद निवडणुकांसाठी सज्ज झाली. त्यामुळे, पुन्हा एकदा महायुती (mahayuti) व महाविकास आघाडीतील शीतयुद्ध समोर आल्याचं दिसून आलं. त्यातच, भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला. मनसेनं अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीत पुन्हा वादंग होतं की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे.
विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 26 जून रोजी मतदान होत आहे. तर, 1 जुलै रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. त्यातच, मनसेनं अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार) मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी नलावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. मनसेनं उमेदवाराची घोषणा केल्यानंतर, आता भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावेळी, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसेला शुभेच्छा देत भाजप कोकण पदवीधरची निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, ही जागा भाजप आमदाराची सिटींग जागा आहे, सध्या निरंजन डावखरे हे येथून आमदार आहेत, असे म्हणत शेलार यांनी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर, आता त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
आशिष शेलार यांनी आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये कोकण आणि मुंबई पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार नेमका कोणाचा असेल, याची चर्चा रंगली आहे. कारण, मनसेने कोकण पदवीधर मतदान संघासाठी अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यातच, आता राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मनसेला भाजपच्या पाठिंब्याची अपेक्षा
दरम्यान, अभिजीत पानसे यांनी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानले होते. तर, मनसेच्या अविनाश जाधव यांनी भाजपने मनसेलापाठिंबा द्यावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. हिंदुत्त्वासाठी लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत, महापालिका निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा द्यायचा, असा पक्ष चालत असतो का?, असा उपरोधात्मक टोलाही जाधव यांनी भाजपला दिला होता. त्यामुळे, कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचा उमेदवार असणार की नाही, हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)