एक्स्प्लोर

अडसूळ असो की बच्चू कडू, यांनी कटप्पाच्या भूमिकेत राहून पाठीत खंजीर खुपसलाय; आमदार रवी राणांची टीका

Maharashtra Politics: आमदार रवी राणा यांनी पलटवार करत आनंदराव अडसूळ आणि  बच्चू कडू यांची भूमिका कटप्पा सारखी असून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. 

Maharashtra Politics अमरावतीअमरावती मतदारसंघात महायुतीची (Mahayuti) डोकेदुखी दिवसागणिक आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. कारण राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul), त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ (Captain Abhijeet Adsul) आणि प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी देखील नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे त्यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोंप आणि टीकेची झोड रंगताना हल्ली बघायला मिळत आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी आता पलटवार करत आनंदराव अडसूळ आणि  बच्चू कडू यांची भूमिका कटप्पा सारखी असून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. 

आनंदराव अडसूळ, बच्चू कडू कटप्पाच्या भूमिकेत 

शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसुळ यांना मी सन्मान दिला. पण आनंदराव अडसूळ यांनी एका महिलेबाबत किती पातळी सोडून बोलायचं, त्यांनी त्याचे सुद्धा भान ठेवलं पाहिजे. मी महायुती मधून बाहेर पडायचं की नाही, हे सांगणारे अडसूळ कोण? त्या बाबत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तो निर्णय घेतील आणि ठरवतील. मी आजही महायुतीमध्ये आहे. उद्याही महायुतीमध्येच राहील. पण त्यांनीच 15 दिवसाचा अल्टिमेट दिला होता. मला जर राज्यपाल पद मिळालं नाही तर मी विचार करेल. असे ते म्हणाले होते.

मुळात आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये काम केलं होतं सिटी को-ऑपरेटिव बँकमध्ये अजून पर्यंत त्यांच्यावर आरोप पत्र दाखल झालं नाही. त्यांनी त्या ठिकाणी मोठा घोटाळा केलाय. त्यामुळे आनंदराव अडसूळ असो की बच्चू कडू यांनी कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून पाठीत खंजीर खुपसला आहे. अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी पलटवार करत निशाणा साधला आहे.

33 महिन्याच्या सरकारमध्ये त्यांनी का दिवा लावला नाही?- रवी राणा

आमदार बच्चू कडू यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या विषयी भाष्य करताना आमदार रवी राणा म्हणाले की, राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या भेटी घेत असतो. जे मुद्दे त्यांनी मांडले ते मुद्दे ज्यावेळेस ते अडीच वर्ष मंत्री होते, तेरा खात्याचे मंत्री आणि ते जलसंधारण मंत्री होते तेव्हा त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये कोणतं मोठं काम केलं ते त्यांनी सांगावं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील पुनर्वसनचे काम सुद्धा केले नाही. त्यांच्या अचलपूर मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पीक घेतलं जातं. मात्र अजूनही एक संत्रा प्रक्रिया उद्योग त्यांनी उभारला नाही.

निवडणूक आल्यानंतर शेतकऱ्यांचे नाव घेऊन ते राजकारण करत आहे. बच्चू कडू यांनी सर्वात आधी अपंग कल्याण शाळा स्वतःच्या संस्थेत घेतली, त्या ठिकाणी किती विद्यार्थी आहे आणि किती लोकांची ग्रँड घेते आहेत, हे पहावं लागेल. शिवभोजन योजना पण त्यांनी स्वतःच्या घरात घेतली. शेतकऱ्या बद्दल जर त्यांना जिव्हाळा असता तर 33 महिन्याच्या सरकारमध्ये त्यांनी का दिवा लावला नाही? असा सवाल करत  रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे. 

हे ही वाचा 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget