एक्स्प्लोर
अॅट्रॉसिटी रद्दची मागणी करणाऱ्यांच्या मेंदूत सुधारणा होत नाही: जोगेंद्र कवाडे

कोल्हापूर: 'अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा किंवा त्यात सुधारणा करा अशी मागणी करणाऱ्या नेत्यांच्या मेंदूमध्ये मात्र, सुधारणा होत नाही.' अशी बोचरी टीका पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. ते कोल्हापूरात बोलत होते. याच वेळी कवाडे यांनी उदयनराजे भोसले आणि राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. 'उदयनराजे आणि राज ठाकरें यांनी अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल केलेलं वक्तव्य हे अज्ञानातून आहे. तर शरद पवारांनी मात्र याबद्दल जाणीवपूर्वक वक्तव्य केलं आहे.' 'अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी कठोर करण्यात याव्या यासाठी 14 एप्रिल 2016 रोजी संसदेत या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. संसदेनं जेव्हा यात सुधारणा केल्या तेव्हा शरद पवार हे राज्यसभेत उपस्थित होते. त्यावेळी पवार साहेबांनी याबाबत मुद्दा उपस्थित का केला नाही?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर अॅट्रॉसिटी कायदा नेमका काय आहे हे समजून घेण्याची गरज असल्याचं मत कवाडे यांनी व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या:
समाजामुळे तुम्ही, तुमच्यामुळे समाज नाही, उदयनराजेंचा पवारांना इशारा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























