एक्स्प्लोर

मंत्री लोणीकरांकडून तक्रारकर्त्याला धमक्या, काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

मंत्री बबनराव लोणीकर आणि त्यांचे पुत्र राहुल लोणीकर यांच्यापासून आपल्याला आणि आपल्या परिवाराला धोका असून आपल्या जीवितास काही झाल्यास मंत्री लोणीकर जबाबदार असतील असेही त्यांनी म्हटले आहे.

जालना : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि त्यांच्या मुलाकडून मला धमक्या येत असल्याची तक्रार याचिकाकर्ते बळीराम कडपे यांनी केली आहे. मंत्री लोणीकरांनी कारखान्याच्या नावानं शेतकऱ्यांच्या पैशानं जमीन लाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणातील याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या पैशातून चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने जमीन लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदार बळीराम कडपे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर साखर आयुक्तांसह जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना नोटीस पाठवली होती. दरम्यान या विषयीचे वृत्त एबीपी माझाने दिल्यानंतर  याचिकाकर्ते बळीराम कडपे यांनी लोणीकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. मंत्री बबनराव लोणीकर आणि त्यांचे पुत्र राहुल लोणीकर यांच्यापासून आपल्याला आणि आपल्या परिवाराला धोका असून आपल्या जीवितास काही झाल्यास मंत्री लोणीकर जबाबदार असतील असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या धमक्यांविरोधात आपण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करून पोलीस संरक्षणाची मागणी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. काँग्रेसकडून मंत्री लोणीकरांच्या राजीनाम्याची मागणी चतुर्वेदेश्वर कारखान्याच्या नावाने शेतकऱ्यांकडून पैसे जमा करून त्या पैशातून कारखान्याची जमीन परस्पर बळकावल्याच्या आरोपानंतर काँग्रेसने मंत्री लोणीकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. जालना काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी एकनाथ खडसे यांना वेगळा न्याय आणि लोणीकरांना वेगळा न्याय का? असा प्रश्न करत लोणीकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची  मागणी केली आहे. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या जालना येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून उद्या लोणीकरांच्या कामाचा भांडाफोड करणार असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर अडचणीत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून साखर कारखान्याच्या नावाखाली पैसे गोळा करून कारखान्यासाठी खरेदी केलेली जमीन नियमबाह्य आपल्या आणि कुटुंबीयांच्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोणीकर यांच्यावर शेतकऱ्यांची परतूर तालूक्यातील लोणी गावामधील 50 एक्कर जमीन चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने आपल्या घशात घातल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदार शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना केलेल्या तक्रारीत आरोप केला होता. मात्र शेतकऱ्यांच्या या तक्रारीकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कानाडोळा केल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. लोणीकर यांनी 2000 साली आमदार असताना, परतूर आणि मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेअर्सच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 5 हजारांच्या रकमा घेतल्या होत्या. त्याच्या शेतकऱ्यांना पावत्याही दिल्या. मात्र चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पावत्यावरील नोंदणी क्रमांक देखील बोगस असल्याचा याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. शिवाय ज्या शेअर्समधून कारखाना उभा केला जाणार होता त्या चतुर्वेदेश्वर नावाच्या कारखान्याची साखर आयुक्तांकडे नोंदच नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget