एक्स्प्लोर

Water Crisis : मराठवाडा आहे की टँकरवाडा? हिंगोलीत अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा, तलाव कोरडा पडल्याने लाखो माशांचा मृत्यू

Marathwada Water Crisis : संपूर्ण मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 10 टक्के पाणीसाठी शिल्लक असून तापमान वाढल्यामुळे जलसाठे कोरडेठाक पडत आहेत.

हिंगोली: मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून हिंगोली जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील पवार तांडा, लक्ष्मण नाईक तांडा, काळीपाणी तांडा सेवादास तांडा यासह अनेक गावांमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातोय. तर जिल्ह्यामध्ये 41 हून अधिक ठिकाणी विहीर आणि बोरचं अधिग्रहण करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

हिंगोलीत हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना दिवसभर टँकरच्या रांगेमध्ये थांबावे लागत आहे. हातात असलेली सर्व कामे सोडून नागरिक महिलांसह लहान मुले पाण्यासाठी टँकरची वाट पाहत आहेत. प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या टँकरमधून सुद्धा अत्यल्प पाणी मिळत आहे. त्यामुळे दिवसभर वापरासाठी पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. 

तलाव कोडला, लाखो माशांचा मृत्यू

सध्या मे महिना सुरू आहे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे हिंगोली चे तापमान 40°c च्या पुढे गेले आहे त्यामुळे भीषण पाणीटंचाई जिल्ह्यात निर्माण झाली आहे. तापमान वाढल्यामुळे जलसाठे कोरडेठाक पडत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वडद येथील तलावातील पाणी आटल्यामुळे  तलावातील लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाला आहे. 

तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं असून पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तलावातील पाणी कमी झाल्याने तलावात असलेले हे सर्व मासे मृत अवस्थेत पाहायला मिळत आहेत. सर्व माशांचा तडफडून मृत्यू झाला असून या मेलेल्या माशांचा खच आता तलाव परिसरामध्ये पाहायला मिळतोय.

मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 10 टक्के पाणीसाठा

राज्यातल्या अनेक धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झाल्याचं दिसून येतंय. संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर धरणांमध्ये  फक्त 10 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या धरणांचा विचार केला तर लातूर, धाराशिव आणि परभणीतील एकाही धरणात 8 टक्क्यांहून अधिक जलसाठा नाही. जायकवाडीचा पाणीसाठा 6 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं चित्र आहे. तर बीडमधील माजलगाव आणि मांजरा या दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे. मागील वर्षी याचवेळी 36 टक्के जलसाठा शिल्लक होता. मांजरा धरणात 1 टक्क्याच्या जवळपास जलसाठा शिल्लक आहे, मागील वर्षी याचवेळी 42 टक्के धरणसाठा शिल्लक होता. 

नगर जिल्ह्यातील भंडरदरा, मुळा आणि निळवंडेतही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. भंडरदऱ्यात 15 टक्के, मुळा धरणात 10.5 टक्के तर निळवंडेत 14 टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलढाण्याची तहान भागवणाऱ्या खडकपूर्णा धरणानं तळ गाठलाय. फक्त पेनटाकळीत 14 टक्के तर नळगंगात 25.5 टक्के जलसाठा उरलेला आहे. 

ही बातमी वाचा: 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Aaditya Thackeray : 'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Embed widget