एक्स्प्लोर

पुराच्या वेढ्याने मराठवाड्याची दैना, जूनपासून आतापर्यंत 84 जणांचा बळी, 3 हजारांहून नागरिकांचे स्थलांतर, धक्कादायक आकडेवारी समोर

या पूराच्या कहरातून गावकरी घाबरले असतानाच, मराठवाड्याचे प्रशासन आणि एनडीआरएफ, आर्मीच्या पथकांनी तातडीने मदत केली.

Marathwada Rain:  मराठवाड्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेकडो गावं विस्कळीत झाली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले, तर पिके, घरं आणि जनावरे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली. पूराच्या कहरातून 84 जणांचा बळी गेला, 13 जण जखमी झाले, 1,954 गाव पुरात सापडली असून 5,729 घरांची पडझड झाली. एनडीआरएफ, आर्मी आणि स्थानिक प्रशासनाच्या तातडीच्या मदतीमुळे 719 लोकांना पुरात अडकण्यापासून वाचले गेले.

मराठवाड्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेकडो गावं विस्कळीत झाली आहे.मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यांमध्ये महापुराने दैना केली आहे. मात्र, शेतीसुद्धा मातीसकट खरडून महापुरात गेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर जगायचं तरी कसं? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. (Flood)  पूरस्थितीमुळे 3,259 नागरिकांना त्यांच्या घरातून सुरक्षित स्थळी हलवावे लागले. यात बीड 1,115, परभणी 1,238, जालना 90, धाराशिव 498 आणि नांदेड 309 नागरिकांचा समावेश आहे. या पूराच्या कहरातून गावकरी घाबरले असतानाच, मराठवाड्याचे प्रशासन आणि एनडीआरएफ, आर्मीच्या पथकांनी तातडीने मदत केली.

पूरात अडकलेले लोक, जलद सुटका

मराठवाड्यात एकूण 719 लोक पुरात अडकले होते. एनडीआरएफ आणि आर्मीच्या पथकांनी या लोकांना सुटका केली. जालना 35, परभणी 3, बीड 185, लातूर 30, धाराशिव 466 लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. आज परिस्थिती नियंत्रणात असून, मराठवाड्यात एकही व्यक्ती पुरात अडकलेली नाही.

फक्त जीवितहानीच नव्हे, तर पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. 23 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात 27,29,779 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. 1,954 गावांमध्ये या पूराने प्रचंड नुकसान केले असून 34,10,349 शेतकऱ्यांची शेती प्रभावित झाली आहे. यापैकी 26,99,269 हेक्टर जिरायत पिकांचे, 14,088 हेक्टर बागायत आणि 16,422 हेक्टर फळपीक वाया गेली आहेत.

पंचनाम्यांची माहिती

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मिळून 20,81,720 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाली आहेत. विभागीय अहवालानुसार संभाजीनगर 1.21 टक्के, जालना 19.3 टक्के, परभणी 84.45 टक्के, हिंगोली आणि नांदेडमध्ये 100 टक्के, बीड 62.36 टक्के, लातूर 77.52 टक्के, धाराशिव 86.18 टक्के पंचनामे पूर्ण झाली आहेत. एकूण पाहता मराठवाड्यात सुमारे 76 टक्के पंचनाम्यांचा काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

जीवितहानी आणि नुकसान

1 जून ते 23 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात पावसामुळे 84 जणांचा बळी गेला, तर 13 जण जखमी झाले. 1,954 गावांमध्ये नुकसान झाल्याचे नोंदवले असून 2,231 लहान-मोठी जनावरे दगावली आहेत. याशिवाय 5,729 घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यानुरूप मृत्यूची संख्या: संभाजीनगर 15, जालना 7, परभणी 6, हिंगोली 11, नांदेड 24, बीड 11, लातूर 6, धाराशिव 4.

मराठवाड्यातील मुसळधार पावसाने फक्त लोकजीवनच नाही तर शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. प्रशासन, बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांनी अनेक लोकांचे प्राण वाचले असले तरी, पिकांचे आणि घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे.

हेही वाचा 

साहेब जगायचं कसं सागा? महापुरात उद्ध्वस्त शेतकऱ्यांची आर्त हाक; उद्धव ठाकरे म्हणाले, खचू नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका, आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो

 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Vasai Virar Rain News: नागरिकांना टेरेसवरून पडणारे पावसाचे पाणी वापरण्याची वेळ; 3 दिवसांपासून वीज, मोबाईल नेटवर्क गायब, वसई-विरारमधील हादरवणारी परिस्थिती
नागरिकांना टेरेसवरून पडणारे पावसाचे पाणी वापरण्याची वेळ; 3 दिवसांपासून वीज, मोबाईल नेटवर्क गायब, वसई-विरारमधील हादरवणारी परिस्थिती
Ketan Agrawal Siya Goyal Pune Lohagadh Case: चलाख, मास्टरमाईंड सिया गोयल, देशाला हादरवणाऱ्या केसची स्टडी; नेमकं काय आहे रघुवंशी प्रकरण?
चलाख, मास्टरमाईंड सिया गोयल, देशाला हादरवणाऱ्या केसची स्टडी; नेमकं काय आहे रघुवंशी प्रकरण?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
Embed widget