एक्स्प्लोर

मोठी बातमी! मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली; रात्री नेमकं काय घडलं?

Declaration Maratha Reservation : विशेष म्हणजे सगेसोयरे बाबतचा अध्यादेश आजपासूनच लागू होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.

Declaration Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, अखेर मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या असून, काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण मागे घेणार आहेत. विशेष म्हणजे सगेसोयरे बाबतचा अध्यादेश आजपासूनच लागू होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला आहे. 

दरम्यान रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन बोलतांना जरांगे म्हणाले आहे की, “आपल्या लढयानुसार  57 लाख नोंदी सापडल्या. त्यांना लवकर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 57 लाखपैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटले असून, त्याचा डाटा लवकरच आपल्याला मिळणार आहे. सगेसोयऱ्याचा अध्यादेश पारित करण्यात आला आहे. याचा सर्वात मोठा फायदा झाला आहे. सरकराने दिलेल्या राजपत्रावर आपल्या वरिष्ठ वकिलांची तीन तास चर्चा झाली. हायकोर्टाच्या वकीलांनी याची पु्र्ण तपासणी केली आहे. आपली लढाई यासाठी होती आणि ती आता पूर्ण झाली आहे. सोबतच आंतरवाली सराटीसह राज्यातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाणार आहे. 

ओबीसीच्या सर्व शैक्षणिक सुविधा 

सोबतच कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येणार आहे. वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्थरावर समिती नेमण्यात येणार आहे. मराठवाड्यातील कुणबी नोंदी तपासले  जाणार आहे. ओबीसी बाबत असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधा मराठा मुलांना मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा विरोध संपला...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आपला त्यांना विरोध संपला आहे. आपली मागणी मान्य झाली आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांना आपण विरोध होता.  समाज म्हणून आपला विषय संपला आहे. मी मुख्यमंत्री यांच्या हस्ते जूस स्वीकारणार आहे. आपण त्यांच्या हस्ते पत्र स्वीकारणार आहोत. समाजाला मी मायबाप मानले आहे. मी तुम्हाला विचारून निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना बोलवू का? यावर सर्वांनी होकार दिल्याने मी निर्णय घेतला आहे.  सर्व खुट्या मी उपटल्या आहेत. मला विजयी सभा प्रचंड मोठी घ्यायची आहे. ती तारीख लवकर घोषित करणार, असल्याचे जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange: शिष्टमंडळाकडून नवा अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : भावकीचा वाद बेतला जीवावर, नाशिकमध्ये दोन गटात जोरदार राडा, कारखाली चिरडून तरुणाचा काढला काटा
भावकीचा वाद बेतला जीवावर, नाशिकमध्ये दोन गटात जोरदार राडा, कारखाली चिरडून तरुणाचा काढला काटा
अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मंत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मंत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी सरन्यायाधीश कशाला पाहिजेत? उपराष्ट्रपतींची विचारणा
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी सरन्यायाधीश कशाला पाहिजेत? उपराष्ट्रपतींची विचारणा
Dhule Crime : चालत्या बसमध्ये दोन महिलांचा चोरीचा प्लॅन, युवकाला कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
चालत्या बसमध्ये दोन महिलांचा चोरीचा प्लॅन, युवकाला कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Massajog Citizen On Suresh Dhas : सुरेश धस- धनंजय मुंडे भेट, मस्साजोगच्या नागरिकांचा संतापSanjay Raut PC : सुरेश धस, मुंडे आणि कराड एकच! देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला..ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 15 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 15 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : भावकीचा वाद बेतला जीवावर, नाशिकमध्ये दोन गटात जोरदार राडा, कारखाली चिरडून तरुणाचा काढला काटा
भावकीचा वाद बेतला जीवावर, नाशिकमध्ये दोन गटात जोरदार राडा, कारखाली चिरडून तरुणाचा काढला काटा
अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मंत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मंत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी सरन्यायाधीश कशाला पाहिजेत? उपराष्ट्रपतींची विचारणा
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी सरन्यायाधीश कशाला पाहिजेत? उपराष्ट्रपतींची विचारणा
Dhule Crime : चालत्या बसमध्ये दोन महिलांचा चोरीचा प्लॅन, युवकाला कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
चालत्या बसमध्ये दोन महिलांचा चोरीचा प्लॅन, युवकाला कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
5 Reasons To Watch Chhaava: 'छावा' का पाहावा? 'ही' 5 कारणं, म्हणून 'हा' चित्रपट पाहायलाच हवा!
'छावा' का पाहावा? 'ही' 5 कारणं, म्हणून 'हा' चित्रपट पाहायलाच हवा!
Arvind Kejriwal : दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच माजी अरविंद केजरीवालांवर आणखी एक 'कुऱ्हाड' कोसळली; थेट आदेश सुद्धा निघाला!
दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच माजी अरविंद केजरीवालांवर आणखी एक 'कुऱ्हाड' कोसळली; थेट आदेश सुद्धा निघाला!
Maharashtra Politics : एकत्र निवडणूक लढायची नसेल असेल तर...; भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू होताच शिवसेना नेत्याचं मोठं विधान
एकत्र निवडणूक लढायची नसेल असेल तर...; भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू होताच शिवसेना नेत्याचं मोठं विधान
महाकुंभसाठी आलेल्या भाविकांची बोलेरोची बसला भीषण धडक; 10 जणांचा अंत, 19 जखमी, मृतदेह काढण्यासाठी अडीच तास लागले
महाकुंभसाठी आलेल्या भाविकांची बोलेरोची बसला भीषण धडक; 10 जणांचा अंत, 19 जखमी, मृतदेह काढण्यासाठी अडीच तास लागले
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.