एक्स्प्लोर

Majha Katta : .. तर मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकमध्ये सलमानला घेतलं नसते, प्रवीण तरडेंचे रोखठोख मत

प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मुळशी पॅटर्न या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.  याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर प्रविण तरडेंनी एक खुलासा केला आहे

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जाणारा चित्रपट म्हणजे 'मुळशी पॅटर्न'. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.  लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मुळशी पॅटर्न या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.  याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर प्रविण तरडेंनी एक खुलासा केला आहे.  जर हा चित्रपट मी केला असता तर सलमान खानला या चित्रपटात मी घेतले नसते, असे मत प्रविण तरडेंनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते. 

प्रवीण तरडे म्हणाले, मुळशी पॅटर्न हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित बनवलेला सिनेमा आहे. मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून मला शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी आली होती परंतु काही कारणांमुळे ती पूर्ण झाली नाही. हा चित्रपट जर प्रवीण तरडेने बनवला असता तर या सिनेमाचे नाव आणि कथानक कधीच बदलले नसते. हिंदीमध्ये देखील मी चित्रपटाचे नाव मुळशी पॅटर्न ठेवले असते. मी स्वत: मुळशी गावचा आहे. एकेकाळी शेतीवर जगणारं हे सधन गाव मी अनुभवलं. मी जगलो. त्या विषयावर मी काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटात मी सलमान खानला कधीच घेतले  नसते. कारण सलमान या भूमिकेसाठी कधी सूट झाला नसता.

कलाकारांच्या निवडीवर विचारलेल्या प्रश्नावर प्रवीण म्हणाला, 'माझ्या चित्रपटांमधील कलाकारांची निवड ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. सध्या मराठी चित्रपट 'धर्मवीर',ची सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. चित्रपट धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित आहे. अभिनेता प्रसाद ओक यानं आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. चित्रपटाची कथा, मांडणी, कलाकार, संगीत सगळ्याच बाबतीत चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पण या चित्रपटात दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रविण तरडे यांची पहिली पसंती प्रसाद नव्हता. 

प्रवीण तरडे म्हणाले,  मुळशीसारख्या गावाची झालेली वाताहत लोकांसमोर आणावी असे आपल्याला वाटले. मी स्वत: मुळशी गावचा आहे. एकेकाळी शेतीवर जगणारं हे सधन गाव मी अनुभवलं. मी जगलो  आणि त्यानंतर याच गावात जमिनी विकून पेटीभर पैसे घेऊन सधन शेतकरी म्हणून मिरवलेले लोक  नंतर पैसे संपल्यावर आपल्याच जागांवर उभ्या राहिलेल्या 'आयटीपार्क' आणि इतर उद्योगांमध्ये सुरक्षारक्षक  म्हणून कसं काम करू लागले. याच शेतकऱ्यांच्या घरात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली मुलं तरुण झाली.  शेतकरी शेतीचा मालक नसून रखवलदार आहे. एका पिढीकरून दुसऱ्या पिढीकडे वारशाने ही जात असते. मातीशी नाते कधीच विकता कामा नये.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon  Crime : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं
Jalgaon  Crime : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं
सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा
सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा
भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला

व्हिडीओ

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget