Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
अहिल्यानगर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी, अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले की, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. येत्या ८ ते १० दिवसांत (किंवा १० दिवसांच्या आत) ही कर्जमाफी पूर्ण केली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली.(Dattatray Bharne on Karjamafi)
Dattatray Bharne on Karjamafi : येणाऱ्या 10 दिवसात कर्जमाफी करणार
सर्वात महत्त्वाची यावर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की, पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांच्या नावाने यावर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी जाहीर केली आहे. येणाऱ्या आठ-दहा दिवसात अहिल्यादेवींच्या नावाने जे कर्ज माफी आहे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये कर्जमाफी केली जाईल, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी यांची परवानगी घेऊन मी आपल्या सगळ्यांना सांगतो असंही पुढे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात केलेले जलसंधारणाचे काम आणि त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. एका इंग्रज लेखकाचा संदर्भ देत भरणे म्हणाले की, जेव्हा जगातील महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अहिल्यादेवींचे नाव प्रथम स्थानी असेल. तर चौंडी गावाचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी साधारण १२०० ते १३०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील २-३ वर्षांत या भागाचे चित्र पूर्णपणे बदलेल, असे त्यांनी सांगितले. हा आराखडा तयार करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राम शिंदे आणि अजित पवार यांनी मोठे सहकार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला.


















