आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
Weather Update: फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्भूमीवर बसलेल्या हवामानानंतर तब्बल आठ दिवसांनी पुन्हा वातावरणात बदल होऊन थंडीची चाहूल लागली आहे.

Weather Update: बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळानं दक्षिणेकडील राज्यांना पावसाचा तडाखा बसला. चक्राकार वारे आणि कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकत अरबी समुद्राकडे आल्याने महाराष्ट्रातही गेल्या चार दिवसांपासून पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. हिवाळ्याची चाहूल लागताच आलेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानही वाढले होते. पण आता कमी दाबाचा पट्टा सैल झाला असून राज्यात पुन्हा गुलाबी थंडीला सुरुवात होणार आहे. येत्या दोन दिवसात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली तरी उर्वरित भागात हवामान कोरडे होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यात गारठा वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्भूमीवर बसलेल्या हवामानानंतर तब्बल आठ दिवसांनी पुन्हा वातावरणात बदल होऊन थंडीची चाहूल लागली आहे. गुहागर मध्ये आज सकाळपासून सर्व भागात धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. थंडीच्या पुनरागमन झाल्यामुळे बागायतदार सुखावले आहेत. फेंगल चक्रीवादळाच्या इफेक्टनंतर आज 7 डिसेंबर रोजी किमान तापमानात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घट झाल्याचे पहायला मिळाले. नंदूरबारमध्ये आज निचांकी तापमानाची नोंद झाली असून 15.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. उर्वरित भागात 17 ते 23 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली. दरम्यान, काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांच्या डोक्यावर अवकाळी पावसाचे काळे ढग घोंगावतायत.
तापमानात घसरण, नंदूरबार निचांकी
राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होते. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला, तर काही भागात उकाडा जाणवू लागला आहे. 9 डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे, तर 7 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे.
अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावले
गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण होते. आज सकाळी पासून ढगाळ वातावरण मुळे गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे धान पीक कापून ठेवलाय आणि हा कापलेला धान या पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहेत. तसेच पावसामुळे भाजीपाला, तुळ पीक यांना सुद्धा नुकसान होण्याची संभावना या पावसामुळे व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा:
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
महत्त्वाच्या बातम्या





















