एक्स्प्लोर

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हैदोस! आज राज्यभर तुफान हजेरी, पुढील 3 दिवस IMD ने सांगितलं ...

Weather Alert:बंगालच्या उपसागरावर तसेच अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील भागात चक्राकार सक्रिय असल्यासही हवामान खात्याने नोंदवलय. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात विस्तीर्ण स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update:  पश्चिम राजस्थानातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागलाय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला असून अनेक भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, घाटमाथासह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड मध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट आहे. 

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून ठिकठिकाणी हवामान खात्याने अलर्ट दिले आहेत. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

हवामान विभागाचा अंदाज काय?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सध्या सुरू झाला आहे. राजस्थान पंजाब आणि गुजरात या राज्यांमधून पुढील दोन दिवसात पाऊस एक्झिट घेणार असून तेलंगणा राज्याला जोडून विदर्भात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.  

दुसरीकडे बंगालच्या उपसागरावर तसेच अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील भागात चक्राकार अरे सक्रिय असल्यासही हवामान खात्याने नोंदवलय. ज्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात विस्तीर्ण स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. 

पुढील तीन दिवस कसे राहणार हवामान? 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज, 15 सप्टेंबर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील तीन दिवस हा जोर हळूहळू कमी होणार तूरळक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने दाणादाण उडवली आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून धरणांमधून मोठा विसर्ग होतोय. त्यामुळे  अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.  उद्यापासून पुढील चार दिवस पावसाचा अंदाज कुठे आहे? पाहूया.

16 सप्टेंबर: रायगड छत्रपती संभाजीनगर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित कोकणपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण मराठवाड्यात येलो अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर व सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे हाय अलर्ट आहेत. 

17 सप्टेंबर: विदर्भातील पावसाचा जोर कमी होणार असून यवतमाळचंद्रपूर या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. बीड लातूर व नांदेड जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता असून उर्वरित मराठवाड्यात येलो अलर्ट देण्यात आलाय. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व सिंधुदुर्ग वगळता कोकणपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट. पुणे सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव  यलो अलर्ट.  सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता. 

18 सप्टेंबर: रत्नागिरी रायगड ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना, जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता 

19 सप्टेंबर: नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना, रायगड जिल्हाला पावसाचा येलो अलर्ट. बहुतांश मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget