विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं, 7 सप्टेंबरपासून सुरु होणार अधिवेशन
महाराष्ट्र विधानसभेचे जुलैमध्ये होणारं पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून सुरु होणार होतं. मात्र आता अधिवेशन 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशन हे जुलैमध्ये होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे या अधिवेशनाला मुहूर्त मिळत नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिले अधिवेशन जे पूर्ण काळ चालले ते म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन. हे अधिवेशन सुरू असतानाच कोरोनाचे संकट आल्यामुळे दोन आठवड्यात अधिवेशन गुंडाळावे लागले. महाराष्ट्र विधानसभेचे जुलैमध्ये होणारं पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून सुरु होणार होतं. मात्र आता अधिवेशन 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
अधिवेशनाच्या काळात विधानभवनात लोक गर्दी करतात. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतो. तसेच प्रशासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी विधानभवनात असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतक्या लोकांनी एकत्र येणं धोकादायक ठरेल. त्यामुळे कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत अधिवेशन पुढे ढकलण्याच निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरसकट सगळे आमदार बोलवण्याऐवजी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे येथील लोकप्रतिनिधींना बोलवून सभागृहाचे कामकाज चालवावे, या पर्यायाचा सरकारकडून विचार सुरु होता. मात्र यावर विरोधी पक्षाने आक्षेप नोंदवला. अधिवेशन कमीत कमी सदस्य संख्येत व्हावं, या प्रस्तास्वला आमचा विरोध होता. हे संविधानात बसणार नाही. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात 60 वर्षांवरील आमदार उपस्थित राहु शकतील का? सरकार दरबारी चर्चा सुरु
- विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाची तयारी; आजपासून 50 टक्के कर्मचार्यांची ड्युटी, दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
महत्त्वाच्या बातम्या





















