एक्स्प्लोर

Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

परतीच्या पावसाला झालेला विलंब, अतिवृष्टी, पूर परिस्थिती या सगळ्या घडामोडींमुळे यंदा हिवाळा थोडा उशिरा सुरू झाला आहे .

Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय . दक्षिण भारतात केरळ आणि तमिळनाडू राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे .तर उत्तर मध्य भारतात हवेतील गारवा चांगलाच वाढतोय . राज्यात आता कडाक्याचा थंडीला सुरुवात झाली आहे . तापमानाचा पारा झपझप खाली येताना दिसतोय . हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फदृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्रात सह मराठवाडा विदर्भात तापमान घसरले आहे . प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार दिवस किमान तापमान कमालीचे घसरणार आहे . बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवेल . (Temperature Down)

पावसाचे चार महिने संपल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता . परतीच्या पावसाला झालेला विलंब, अतिवृष्टी, पूर परिस्थिती या सगळ्या घडामोडींमुळे यंदा हिवाळा थोडा उशिरा सुरू झाला आहे .

विदर्भ गारठला, मराठवाड्यात काय स्थिती?

गेल्या तीन ते चार दिवसांपासून विदर्भात किमान तापमानाचा पारा वेगाने घसरत आहे . गेल्या 24 तासात 2 ते 3 अंशांनी तापमान घसरले असून गोंदिया जिल्ह्यात 10.5 अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे . जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून 9.2 अंश सेल्सियसवर पारा गेलाय . मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी 15 अंशाखाली गेलाय . आज कुठे किती तापमान होतं पाहूया .

अहमदनगर – 11.4°C

छत्रपती संभाजीनगर – 12.4°C

बीड – 11.4°C

दहानू – 17.4°C

हरनाई – 21.6°C

जळगाव – 9.2°C

जिऊर (जिउर/जुर) – 10.5°C

कोल्हापूर – 16.9°C

महाबळेश्वर – 12.5°C

मालेगाव – 11.2°C

मुंबई (सांताक्रूझ) – 19.8°C

नाशिक – 10.7°C

धाराशिव – 14.0°C

परभणी – 13.5°C

रत्नागिरी – 18.4°C

सांगली – 15.1°C

सातारा – 13.5°C

सोलापूर – 16.4°C

उदगीर – 14.0°C

महाराष्ट्रात किमान तापमान का घटलंय ?

उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत लहरींमुळे येत्या शुक्रवार पर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितलं . 

- हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फदृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई सोबत लगतच्या परिसरात तापमान कमी झाले आहे .

- दुसरीकडे मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली ,उत्तर प्रदेश या भागात थंडीची लाट राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget