एक्स्प्लोर

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरला, आज रायगडसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट 

Maharashtra Rain : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. राज्यातील कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील चार ते पाच दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागानं राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असला तरीही राज्यात सध्या पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागातच पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाडून करण्यात आलं आहे.  

गोंदिया जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

गोंदिया जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळं नदी-नाल्यांसह धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार काल दिवसभर देखील पावसाचा जोर कायम होता. त्यामुळं नदी नाले दुधडी भरून वाहू लागले आहेत. अशातच नदीपात्रातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशी आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोसीखुद्र धरणाचे दरवाज उघडले

भंडारा जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. तर काही भागात हलका तर कुठं रिमझिम पाऊस सुरू आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळं जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह तिला जोडलेल्या उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळं नदी काठांवर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि नदी नाल्यांना आलेल्या पाण्याची पातळी बघायला कुणीही जावून जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तसेच गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस

पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीदेखील अहमदनगर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळं भर पावसाळ्यात जिल्ह्यात पाणी टंचाई सुरु झाली आबे. अहमदनगर जिल्ह्यात 57 टँकरद्वारे 60 गावातील 344 वाड्यावस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातोय. जवळपास सव्वा लाख नागरीकांना भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. 

 धरणांच्या, नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट 

राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. त्या भागात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तिथं शेती कामांना वेग आला आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही, त्याठिकाणी धरणांच्या, नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. काही भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, तिथं धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nagpur Rain : नागपुरात मुसळधार पाऊस, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो; हिंगणा भागात वेणा नदीला पूर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Jan Aakrosh Morcha : Santosh Deshmukh , Somnath Suryawanshi प्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चाABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 25 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सJanaakrosh Morcha :संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशीना न्याय द्या,  मेट्रो सिनमा ते आझाद मैदानापर्यंत मोर्चाIndapur Harshwardhan Patil : इंदापुरातील कार्यक्रमातच हर्षवर्धन पाटलांना प्रेक्षकांमध्ये बसवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Embed widget