एक्स्प्लोर

Maharashtra Rain Update : अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका

Maharashtra Rain Update : राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि इतर ठिकाणी सुरु असलेल्या पावसाची प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगवर. 

LIVE

Key Events
Maharashtra Rain Update : अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका

Background

Maharashtra Rain Update : हवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादेत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात आजसाठी चारही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. ह्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापसाचं नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसू शकतो. 

बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून आज सकाळी पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी  होत आहे. त्यामुळे सर्वच नदी ओढ्याना पूर आलेला आहे. शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. अनेक प्रकल्प पूर्ण भरले असून काही प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.

मराठवाड्यात भीषण पाऊस सुरु 

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचं रौद्ररूप पहायला मिळत असून सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. मांजरा नदीच्या पुरात 17 जण अडकले असून बचाव कार्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. इतर ठिकाणीही अनेकांच्या घरात घुसले पाणी. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. 

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या दोन्ही विभागातील सात जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यातआला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबादसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात ह्या भागात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज असेल. दुसरीकडे, अरबी समुद्रात देखील वाऱ्यांचा वेगअधिक असल्यानं मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

20:28 PM (IST)  •  28 Sep 2021

अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका

अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी नाशिक 1, जालना 1, बीड 2, उस्मानाबाद 2, परभणी 2, लातूर 1, बुलढाणा 1, यवतमाळ 3 मृत्यू झाले आहेत. तर 4 जण जखमी झाले आहेत. 205 जनावरांचे या पुरात मृत्यू झाले आहेत. एनडीआरएफ एअर फोर्सची एक तुकडी कार्यरत आहे तर एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत कार्य सुरु आहे.

19:26 PM (IST)  •  28 Sep 2021

नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात. मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर चक्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाण्याचा प्रश्‍न सुटण्याची शक्यता.

18:32 PM (IST)  •  28 Sep 2021

वैजापूरच्या बोरसरच्या भिंगी गावात एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलीय

वैजापूरच्या बोरसरच्या भिंगी गावात एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलीय. तलाव फुटल्याने बोरसरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. याचं प्रवाहात एक मनोरुग्ण महिला वाहून गेली.

18:05 PM (IST)  •  28 Sep 2021

उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथे आज हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांचे रस्क्यू

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे काही ठिकाणी लोक अडकले होते. आज सकाळपासून एकवीस लोकांना वेगवेगळ्या यंत्रणांनी रेस्क्यु ऑपरेशन करून त्यांचे सुटका केली. उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथेही आज हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. या हेलिकॉप्टरचा वापर करून दावतपुर गावातून पाच सहा जणांची सुटका करण्यात आली. यासाठी संरक्षण विभागात हेलिकॉप्टर वापरण्यात आलं होतं. दाऊतपुरला चारही बाजूनं नदीपात्राच्या पाण्याने वेढल्यामुळे हे लोक शेतामध्ये अडकले होते.

18:01 PM (IST)  •  28 Sep 2021

मराठवाड्यात पुरामुळे हाहाःकार, 35 जणांचा मृत्यू, 4 ते 5 हजार जनावरं गेली वाहून

मराठवाड्यात पुरामुळे हाहाःकार, 35 जणांचा मृत्यू, 4 ते 5 हजार जनावरं गेली वाहून, 20 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deekshabhoomi Nagpur :  नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP MajhaBhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर  'माझा'वर : ABP MajhaNagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफरABP Majha Headlines :  1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
T20 World cup: विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 11 खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी BCCIचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांचा सभात्याग
जिंकली टीम इंडिया, पण अभिनंदन आशिष शेलारांचं, सभागृहात हल्लाबोल, विरोधकांचा सभात्याग
Embed widget