एक्स्प्लोर

Maharashtra Rain : पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाच अंदाज 

Rain : राज्यात तुरळक ठिकाणी पावसानं (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Maharashtra Rain : राज्यात तुरळक ठिकाणी पावसानं (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जुलै महिन्याचा पंधरवाडा संपत आला तरी राज्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, मुंबईसह उपनगरात पावसानं चांगली हजेरी लावली. त्याचबरोबर ठाणे, पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, पुढचे चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. 

या भागात पडणार पाऊस

सध्या राज्यात काही ठिकाणीच पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. काही ठिकाणी मात्र, जोरदार पाऊस पडत आहे.  हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस

वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. त्यामुळं आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिसोड तालुक्यातील कोयाळी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अनेक भागात चांगला पाऊस बरसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पेरणी केल्यानंतर दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती. 

यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे. गेल्या तीस वर्षात इतका पाऊस गावात पडला नव्हता. इकडे शेतकऱ्यांनी जमिनीत स्वप्न पेरले होते. मात्र तो साखर झोपेत असतानाच त्याचे हे स्वप्न या पावसाने पुरते वाहून नेले. ज्या मातीच्या आधारे हे स्वप्न वर येते त्या मातीसहित या स्वप्नांचा चिखल झालाय. शेतात उरले फक्त दगड अन् खड्डे. मुसळधार कोसळलेल्या पावसाने सावरगाव, गोळेगाव , ब्राह्मनवाडा, शिरजगाव,पांढरी, पिंपळगाव काळे शिवारातील जवळपास 114 हेक्टर जमिनीवरील पिके पूर्णतः उध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. एका पावसाने शेतकरी उघड्यावर पडले आहे. उद्ध्वस्त शेतशिवार अन् बांधा वरील हतबल बळीराजा हे दृश्य काळजाच्या ठिकऱ्या उडवणारे आहे.

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणामध्ये तब्बल 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. तसंच या धरणाच्या खाली असलेलं कवडास धरण ओव्हरफ्लो झालं आहे. धरण क्षेत्रामध्ये एकजून पासून आतापर्यंत एकूण एक हजार 739 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसंच पालघर जिल्ह्यातील इतर लहान धरणांमध्येही चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. या धरणांमधून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरं आणि लगतच्या वसई विरार आणि मीरा-भाईंदर महापालिकांना पाणीपुरवठा होतो.

नंदुरबार जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आले आहेत. त्याच्यासोबत मध्य प्रदेश मध्ये तापी नदीच्या उगम स्थळावर झालेल्या पावसामुळे हातनुर धरणांमधील पाण्याची पातळी वाढली असून हातनूर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातही जोरदार पाऊस असल्याने अनेक छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आले आहेत. त्यातून तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील तापी नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Akola Rain Updates: अकोल्यात धुवांधार पाऊस; पुरात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल तेरा तासांनी सापडला

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसाच....
'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल'; मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget