एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा; जिद्द, संयम, डावपेच... देवेंद्र फडणवीस पुन्हा कसे आले? Inside Story

Maharashtra Political Crisis :  'अकेला देवेंद्र क्या करेगा' असा प्रश्न विचारला जायचा. या एकट्या देवेंद्रने आता तीन पक्षांचं सरकार पाडलं आणि पुन्हा सत्तेच्या मार्गावर येण्याची किमया केलीय. 

मुंबई: मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पण शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि देवेंद्र फडणवीसांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्याचं स्वप्न धुळीला मिळालं. या अडीच वर्षाच्या काळात सरकार पडेल असं वाटत असताना ते तरलं. पण अंतर्गत बंडाळीने घात केला आणि जे व्हायचं ते झालं, उद्धव ठाकरे सरकार पडलं. 'अकेला देवेंद्र क्या करेगा' असा प्रश्न विचारला जायचा. या एकट्या देवेंद्रने आता तीन पक्षांचं सरकार पाडलं आणि पुन्हा सत्तेच्या मार्गावर येण्याची किमया केलीय.  आता देवेंद्र फडणवीस पुन्हा येतायत.

अडीच वर्षात काय केलं देवेनभाऊंनी? 
या अडीच वर्षांच्या काळात भाजप नेते चंद्रकात पाटील आणि नारायण राणे, तसेच अनेक भाजप नेत्यानी हे सरकार आता पडेल, मग पडेल, चार दिवसात पडेल, येत्या पंधरा दिवसात पडेल असा अंदाज सातत्याने व्यक्त केला. पण सरकार काही पडलं नाही. याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एकदाही तसं म्हटलं नाही. हे सरकार अंतर्गत बंडाळीमुळे पडेल असंच ते म्हणत राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं सरकार हे जास्त दिवस टिकणार नाही असं ते सातत्याने म्हणत राहिले. 

मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी मात्र हे सरकार पाडण्याचा काही जास्त प्रयत्न केला नाही. अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीचा फज्जा उडाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अधिक सजग झाले आणि त्यांनी ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली. त्यांनी या काळात सरकार पाडण्यासाठी त्यांनी कधीच सक्रिय भूमिका घेतली नाही. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुर्दैवाने राज्यावर कोरोनाचे संकट आले. या काळात उद्धव ठाकरे यांनी राज्याचे प्रमुख म्हणून चांगलं काम केल्याचं दिसतंय. पण याच काळात दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीस यांनी अनेक दौरे केले, जनतेमध्ये थेट जायला प्राधान्य दिलं. याची चर्चा जरी जास्त झाली नसली तरी देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सोडलं नाही. 

अंतर्गत बंडाळीमुळे हे सरकार पडेल
राज्यातील सरकार भाजप पाडणार नाही, हे सरकार अंतर्गत बंडाळीमुळे पडेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. तशीच संधी ते शोधत होते आणि ती संधी मिळाली ती राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे. या दोन्ही निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपले अतिरिक्त उमेदवार सहज निवडून आणले तेही महाविकास आघाडीच्या आमदारांना फोडून. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे त्यांना चांगलंच माहिती होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्याचा फायदा घेतला आणि महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला. शिवसेनेला तर त्यांच्या गोटातील नेते फोडून जबरदस्त उत्तर दिलं. 

देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना आपलंसं केलं, शरद पवार यांचं वक्तव्य
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना आपलंसं केलं, अनेक लोकांशी जोडून घेतलं. शरद पवारांनी कौतुक केल्यानंतर काय मेसेज जायचा तो गेला. पण खरंच, गेल्या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते म्हणून जे काम केलं त्याला तोड नाही. कुणाच्या स्वप्नातही आलं नाही असं तीन पक्षांचं सरकार अडीच वर्षे चाललं, हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी एक प्रकारचा बोनसच होता. पण या काळात कधीही हताश न होता देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सुरूच ठेवलं. इतर भाजप नेत्यांप्रमाणे उतावीळपणा न दाखवता त्यांनी संयमाने काम केलं. 

आता ते पुन्हा येतायत... देवेनभाऊंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार हे नक्की... त्यांचं एकहाती नेतृत्व पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार हे नक्की.

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Bansode NCP Meeting : पक्षात कोणताही वाद नाही, राष्ट्रवादी एकसंघ! देवगिरीवरील बैठकीनंतर संजय बनसोडेंनी सगळंच सांगितलं
पक्षात कोणताही वाद नाही, राष्ट्रवादी एकसंघ! देवगिरीवरील बैठकीनंतर संजय बनसोडेंनी सगळंच सांगितलं
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता; काँग्रेसचं पत्र
पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता; काँग्रेसचं पत्र
Maharashtra LIVE Blog Updates: विधान परिषदेच्या नावांची यादी भाजप राष्ट्रीय अध्यक्षांना सुपूर्द; एकूण 48 नावांची यादी
Maharashtra Live blog updates: विधान परिषदेच्या नावांची यादी भाजप राष्ट्रीय अध्यक्षांना सुपूर्द; एकूण 48 नावांची यादी

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pinarayi Vijayan ED Raid: केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Akola News : अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
Embed widget