एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा; जिद्द, संयम, डावपेच... देवेंद्र फडणवीस पुन्हा कसे आले? Inside Story

Maharashtra Political Crisis :  'अकेला देवेंद्र क्या करेगा' असा प्रश्न विचारला जायचा. या एकट्या देवेंद्रने आता तीन पक्षांचं सरकार पाडलं आणि पुन्हा सत्तेच्या मार्गावर येण्याची किमया केलीय. 

मुंबई: मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पण शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि देवेंद्र फडणवीसांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्याचं स्वप्न धुळीला मिळालं. या अडीच वर्षाच्या काळात सरकार पडेल असं वाटत असताना ते तरलं. पण अंतर्गत बंडाळीने घात केला आणि जे व्हायचं ते झालं, उद्धव ठाकरे सरकार पडलं. 'अकेला देवेंद्र क्या करेगा' असा प्रश्न विचारला जायचा. या एकट्या देवेंद्रने आता तीन पक्षांचं सरकार पाडलं आणि पुन्हा सत्तेच्या मार्गावर येण्याची किमया केलीय.  आता देवेंद्र फडणवीस पुन्हा येतायत.

अडीच वर्षात काय केलं देवेनभाऊंनी? 
या अडीच वर्षांच्या काळात भाजप नेते चंद्रकात पाटील आणि नारायण राणे, तसेच अनेक भाजप नेत्यानी हे सरकार आता पडेल, मग पडेल, चार दिवसात पडेल, येत्या पंधरा दिवसात पडेल असा अंदाज सातत्याने व्यक्त केला. पण सरकार काही पडलं नाही. याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एकदाही तसं म्हटलं नाही. हे सरकार अंतर्गत बंडाळीमुळे पडेल असंच ते म्हणत राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं सरकार हे जास्त दिवस टिकणार नाही असं ते सातत्याने म्हणत राहिले. 

मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी मात्र हे सरकार पाडण्याचा काही जास्त प्रयत्न केला नाही. अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीचा फज्जा उडाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अधिक सजग झाले आणि त्यांनी ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली. त्यांनी या काळात सरकार पाडण्यासाठी त्यांनी कधीच सक्रिय भूमिका घेतली नाही. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुर्दैवाने राज्यावर कोरोनाचे संकट आले. या काळात उद्धव ठाकरे यांनी राज्याचे प्रमुख म्हणून चांगलं काम केल्याचं दिसतंय. पण याच काळात दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीस यांनी अनेक दौरे केले, जनतेमध्ये थेट जायला प्राधान्य दिलं. याची चर्चा जरी जास्त झाली नसली तरी देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सोडलं नाही. 

अंतर्गत बंडाळीमुळे हे सरकार पडेल
राज्यातील सरकार भाजप पाडणार नाही, हे सरकार अंतर्गत बंडाळीमुळे पडेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. तशीच संधी ते शोधत होते आणि ती संधी मिळाली ती राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे. या दोन्ही निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपले अतिरिक्त उमेदवार सहज निवडून आणले तेही महाविकास आघाडीच्या आमदारांना फोडून. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे त्यांना चांगलंच माहिती होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्याचा फायदा घेतला आणि महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला. शिवसेनेला तर त्यांच्या गोटातील नेते फोडून जबरदस्त उत्तर दिलं. 

देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना आपलंसं केलं, शरद पवार यांचं वक्तव्य
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना आपलंसं केलं, अनेक लोकांशी जोडून घेतलं. शरद पवारांनी कौतुक केल्यानंतर काय मेसेज जायचा तो गेला. पण खरंच, गेल्या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते म्हणून जे काम केलं त्याला तोड नाही. कुणाच्या स्वप्नातही आलं नाही असं तीन पक्षांचं सरकार अडीच वर्षे चाललं, हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी एक प्रकारचा बोनसच होता. पण या काळात कधीही हताश न होता देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सुरूच ठेवलं. इतर भाजप नेत्यांप्रमाणे उतावीळपणा न दाखवता त्यांनी संयमाने काम केलं. 

आता ते पुन्हा येतायत... देवेनभाऊंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार हे नक्की... त्यांचं एकहाती नेतृत्व पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार हे नक्की.

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
Sushma Andhare: अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget