![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
![Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा... Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/17/90ee366c4d25f2079e1d1051a2905a241708133832352265_original.jpeg)
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
डॉल्बी आणि बॅनरचा खर्च टाळून गरीब विद्यार्थिनींची भरली शाळेची फी, शिवजयंती निमित्ताने सोलापुरात शिवसेनेचा अनोखा उपक्रम
सोलापुरात शिवसेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरा करण्यात येतेय. डॉल्बी आणि डिजिटल बॅनरचा खर्च टाळून शिवसेना सोलापूर उत्तर विभागाच्या पदाधिकऱ्यांनी गरजू मुलींच्या शिक्षणाला मदत केली. सोलापुरात कोणतीही जयंती असली तरी डॉल्बी आणि डिजिटलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे टाळण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात आवाहन केले जात आहे. डॉल्बीमुळे होणारा त्रास आणि डिजिटल बॅनरवर होणारा खर्च लक्षात घेता शिवसेना उत्तरं विभागाने विचारांची शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. आज छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर सरस्वती विद्यामंदिर या शाळेला 55 हजार रुपयांची देणगी दिली. ज्या विद्यार्थिनींनी शाळेची फी भरलेली नाही किंवा अर्धवट फी भरली आहे अशा विद्यार्थिनींची फी या रकमेतून करण्यात यावी अशी विनंती शिवसेनेतर्फे शाळेला करण्यात आली. " छत्रपती शिवरायांची जयंती ही विचारांनी साजरी व्हावी आमचा उद्देश आहे. त्यामुळे यंदा डॉल्बी आणि बॅनरचा खर्च टाळून आणि 55 हजार रुपयांची देणगी शाळेला दिली आहे. भविष्यात ही देणगी पाच लाख रुपयांपर्यंत कशी घेऊन जाता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोलापुरातील इतरही मंडळांनी डॉल्बी बॅनरचा खर्च टाळून गरजवंतांना मदत करावी " असे आवाहन शिवसेना उत्तरचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी केले. त्यांनी या केलेल्या कार्याचे संपूर्ण सोलापुरात कौतुक होत आहे
मुंबईतुन लोकसभेसाठी कांग्रेस नेत्यांची रस्सीखेच
मुंबईतुन लोकसभेसाठी कांग्रेस नेत्यांची रस्सीखेच
माजी मंत्री अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी लोकसभेसाठी केली मागणी
मुंबईत अल्पसंख्याकांसाठी एक जागा देण्यासाठी अस्लम शेख यांचा आग्रह
प्रभारी रमेश चन्नीथला यांच्याकडे केली मागणी
...तर फडणवीसांनी पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी दिली असती- अंधारे
देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षण झुलवत ठेवायचं असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. शिंदे फडणवीस पवार सरकारने एक अध्यादेश काढून केंद्र सरकारकडे पाठवला तर केंद्रामध्ये भाजपाकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे भाजपाची इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकतं मात्र फडणवीस ठरवून ओबीसी मराठा वाद लावून पहात आहेत. त्यांना ओबीसींची देखील अजिबात काळजी नाही. ओबीसी नेत्यांची देखील काळजी नाही असं असतं तर अशोक चव्हाण ऐवजी त्यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असती. गोपीनाथ मुंडे यांची बॅग सांभाळणारे फडणवीस त्यांच्याच मुलीचं राजकारण संपवू पाहत आहेत. असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
मराठा समाज आक्रमक , पंढरपूरकडे येणारे सर्व मार्गावर चक्का केल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने आज पंढरपूरकडे येणारे सर्व मार्ग रोखून धरल्याने सकाळीपासून कोणतेही वाहन येऊ शकले नसून एकही वाहन बाहेर पडू शकलेली नाही . सातारा पुणे या मार्गावरून येणाऱ्या मार्गावर वाखरी चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केल्याने सातारा व पुणे मार्गावरून येणारी शेकडो वाहने अडकून पडली आहेत . गोपाळपूर चौकात केलेल्या चक्क जॅम मुले मंगळवेढा आणि कर्नाटक मधून येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे . याशिवाय कासेगाव येथे सुरु असलेल्या चक्का जाम मुले कोल्हापूर आणि कोकणातून येणारी वाहतूक थांबली आहे . याच पद्धतीने नदीच्या पलीकडे तीन रस्त्यावर रास्ता रोको केल्याने मराठवाडा कडून येणारी सर्व वाहतूक अडविण्यात आलेली आहे . आज सकाळी नऊ वाजल्यापासून या चक्का जाम सुरु झाल्याने पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर अभूतपूर्व वाहतूक जाम बनला आहे . या रास्ता रोकोमुळे पंढरपूरातून देखील वाहने बाहेर पडू शकत नसल्याने सर्वच मार्गावर शेकडो एसटी बसेस अडकून पडल्या आहेत . सर्वच ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असून सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन केले जात आहे . या रास्तारोकोमुळे प्रवासी हैराण झाले असून पोलीस आणि महसूल प्रशासन आंदोलकांशी चर्चा करीत लवकर हा रास्ता रोको मागे घेण्याच्या प्रयत्नात आहे.
सिंधुदुर्गातील डिगस गावात गवारेड्यांकडून उन्हाळी शेतीची नासधूस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील डिगस- सुर्वेवाडी परिसरात गवा रेड्यांनी धुमाकूळ घालत वायंगणी भातशेतीसह चवळी, मका, उडीद, कुळीथ, मिरची, भुईमूग आदी पिकांची नासधूस करून नुकसान केले. रात्रीच्या वेळी या गवा रेड्यांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने या वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गवारेड्यांचा वावर सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी. तसेच नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)