एक्स्प्लोर

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु, जनजीवन विस्कळीत

समुद्राला उधाण येत असल्यानं किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीतील नद्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. 

रत्नागिरी : गेली चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार बसरणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. शिवाय, प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे. वरुण राजा काही काळ विश्रांती घेतो आणि त्यानंतर पुन्हा बरसायला सुरुवात करतो. सद्यस्थितीत परिस्थिती पाहता काही भागांमध्ये पावसानं अल्पकालावधीकरता विश्रांती घेतली आहे. पण, वातावरण मात्र पावसाकरता पुरक असून आगामी काळात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

खाडी किनारच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्राला देखील उधाण येत असल्यानं किनारपट्टीवरील नागरिकांना देखील त्याबाबतच्या सूचना दिल्या गेला आहेत. आगामी आणखी चार दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 5 जून रोजी मान्सूनचं कोकणात आगमन झालं. पण, त्यानंतर 10 जूनपर्यंत पावसाचा पत्ता नव्हता केवळ पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. त्यानंतर 11 जूननंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू लागला. पण, हा पाऊस सरींवर होता. अखेर 13 जूननंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत गेला. आज घडीला जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती आहे. 

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी सध्या 5.10 मीटर आहे. याच नदीची इशारा पातळी 6 मीटर तर धोका पातळी 7 मीटर आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची सध्याची पाणी पातळी 3.60 मीटर आहे. तर, याच नदीची इशारा पातळी 5 मीटर असून धोका पातळी 7 मीटर आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीची सद्याची पाणी पातळी 13.63 मीटर असून काजळी नदीची इशारा पातळी 16.5 तर धोका पातळी 18 मीटर आहे. राजापुरातील कोदवली नदीची सध्याची पातळी 4.30 मीटर आहे. तर याच कोदवली नदीची इशारा पातळी 4.9 मीटर असून धोका पातळी 8.13 मीटर आहे. संगमेश्वर तालुक्यात शास्त्री, सोनवी आणि बावनदी या मुख्य नद्या आहेत. त्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. शास्त्री नदी सध्या 4.60 मीटरवरून वाहत आहे. शास्त्री नदीची इशारा पातळी 6.2 मीटर तर धोका पातळी 7.8 मीटर आहे. सोनवी नदीची सध्याची पाणी पातळी 4.40 मीटर आहे. याच नदीची इशारा पातळी 7.2 मीटर असून धोका पातळी 8.6 मीटर आहे. बावनदीची धोका पातळी 11 मीटर असून इशारा पातळी 9.4 मीटर आहे. सद्यस्थितीत या नदीची पाणी पातळी 5.75 मीटर आहे. तर, लांजामधील मुचकुंदी नदी सध्या 1.80 मीटरवरून वाहत आहे. मुचकुंदीची इशारा पातळी 3.5 मीटर असून धोका पातळी 4.5 मीटर आहे. (( सदर आकडेवारी ही 16 जून 2021 रोजी संध्याकाळी सहा वाजताची आहे. पावसाच्या प्रमाणानुसार त्यात सद्यस्थितीत बदल असू शकतो ))

कुठं घडल्या दुर्घटना?
रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे मोठी दुर्घटना अद्याप तरी झालेली नाही. पण, राजापुरातील बाजारपेठेत पाणी शिकण्याची शक्यता पाहता त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सामान सुरक्षित स्थळी हलवण्याला प्राधान्य दिलं. तर नागरिकांना देखील सतर्क करण्यात आलं. रत्नागिरी तालुक्यातील काही ठिकाणी झाडं उन्मळून पडणे, रस्ता खचणे तसेच काही ठिकाणी घरांचं किरकोळ नुकसान झालं आहे. दापोली तालुक्यात पाचपंढरीमध्ये दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता दोन घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर, गुहागर तालुक्यात पालशेत इथं पूर आल्यानं बुधवारी संध्याकाळपर्यंत 12 गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याचं चित्र आहे. 

शेतकऱ्यांचं वेळापत्रक कोलमडलं
सध्याचा काळ हो कोकणातील भातशेतीच्या कामांचा कालावधी. याचवेळी भातीची पेरणी केली जाते. पण, मुसळधार पाऊस आणि त्याबाबत हवामान विभागानं केलेलं आवाहन पाहता शेतकऱ्यांचं शेतीचं वेळापत्रक मात्र विस्कळीत झालं आहे. 

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Premachi Goshta Latest Episode : सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Satara : Sharad Pawar साताऱ्यात दाखल , माढा आणि साताऱ्याचा उमेदवार ठरणार ?Bachchu Kadu : दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद; बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार!ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsSanjay Raut Full Speech : मविआमध्ये कुठलाच वाद नाही,  ठाणे आणि कल्याण आम्हीच जिंकणार : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Premachi Goshta Latest Episode : सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
Embed widget