एक्स्प्लोर

Aurangabad: 'अग्निपथ'चा फटका औरंगाबादकरांसह इतर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनाही

Agnipath Scheme Protest: रेल्वे प्रवास कसा करावा अशी भीती आता प्रवाशांमध्ये पाहायला मिळत आहे.

Agnipath Scheme Protest: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. अनेक राज्यांमध्ये यावरून हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. आंदोलकांनी रेल्वे गाड्यांना निशाणा करत अनेक गाड्या पेटवून दिल्या आहेत. तर याचा फटका आता देशभरातील रेल्वे प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे औरंगाबादसह मराठवाड्यातील जालना,नांदेडसह इतर जिल्ह्यातील प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. कारण गेल्या दोन दिवसात चार रेल्वे अग्निपथ विरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे रद्द कराव्या लागल्या आहेत. 

तेलंगणात सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी तोडफोड करून रेल्वेला आग लावल्याने शुक्रवारी दोन रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. त्यांनतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सुद्धा मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेस आणि श्री साईनगर शिर्डी रेल्वेस्टेशनवरून सुटणारी शिर्डी-सिकंदराबाद एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अग्निपथवरून सुरु असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका रेल्वे प्रवाशांना बसताना पाहायला मिळत आहे. 

औरंगाबादमध्ये पोलीस बंदोबस्त...

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध म्हणून नॅशनल स्टुडंटस ऑफ इंडिया या संघटनेतर्फे क्रांती चौकात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र देशातील परिस्थिती पाहता पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली होती. त्यामुळे हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान त्यांनतर सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी क्रांती चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 

हिंसाचारामागे कोचिंग सेंटर

बिहारमधील हिंसक निदर्शनांमागे अनेक कोचिंग सेंटरची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती पटनाचे डीएम चंद्रशेखर सिंह यांनी दिली आहे. "हिंसक निदर्शना प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीत 7 ते 8 कोचिंग सेंटर्सनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या लोकांच्या फोनवर हिंसक संदेश पाठवल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी 170 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यापैकी 46 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रशेखर सिंह यांनी दिली.  

शांतता राखण्याचे आवाहन

बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी राज्यात परिस्थिती आता सामान्य होत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. केंद्राने तरुणांसाठी चांगली योजना बनवली आहे. त्यातून त्यांना अनेक फायदे होतील, असे प्रसाद यांनी म्हटले आहे. काल आंदोलनकर्त्यांनी प्रसाद यांच्या घरावर हल्ला केला होता.  

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget