एक्स्प्लोर

Maharashtra Rain Updates: मुंबईला ऑरेंज, तर ठाणे, नाशिकला रेड अलर्ट; राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला आहे, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकल्यानं पावसाचा जोर ओसरणार असल्याची हवामान विभागाची माहिती.

Maharashtra Mumbai Rain Updates: दोन दिवस पावसानं मुंबईला (Mumbai Rain) झोडपल्यानंतर आज मात्र, उसंत घेतली आहे. मुंबईच्या अनेक भागांत पावसानं विश्रांती घेतली आहे. तर, काही भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट (Orange Alert For Mumbai) देण्यात आला आहे. तसेच, नाशिक, पुणे, साताऱ्यातील घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात खबरदारी म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या 48 तास एमएमआरसाठी रेड अलर्ट होता आणि तसाच मुसळधार पाऊसही पडला. मात्र सहानंतर हा अलर्ट कमी करत ऑरेंज केला आहे. मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून पावसानं हजेरी लावली. आज मुंबईतील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुपारपर्यंत मुंबईतील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडसाठी आज देखील रेड अलर्ट कायम असून अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय नाशिक, सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाल्यानं पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर विदर्भात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांसह पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबईला ऑरेंज अलर्ट 

मुंबईसाठी आज देखील ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकल्यानं पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. मोठा पाऊस होणार नसला तरीसुद्धा खबरदारी म्हणून हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज दुपारनंतर पावसाचा जोर ओसरणार असून उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पावसामुळे वसई विरार जलमय, 12 तासांपासून लाईट नाही 

वसई, विरार, नालासोपारामधील काही भाग 12 तासांपासून पाण्याखाली आहे.  तिथल विद्युत सप्लाय बंद असल्यानं नागरिकांचे हाल झाले आहेत.  कालच्या पावसामुळे वसई विरार जलमय झालं होतं. अनेक सखल भागातील सोसायट्यांमध्ये पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या मीटर बॉक्सपर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे महावितरणाने खबरदारी घेत वीज सप्लाय बंद केला होता. ज्या सोसायटीचे पाणी उतरले तेथील ट्रान्सफार्म सुरु करण्यात आले. मात्र अजही वसई विरार आणि नालासोपारातील काही भागातील पाणी ओसरलं नसल्याने वीज नाही आहे. जवळपास 12 तासांपासून काही ठिकाणी वीज नाही आहे. 

नाशिकला रेड अलर्ट, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोदाकाठावरील मंदिरना पाण्यानं वेढा द्यायला सुरुवात झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागलं आहे  नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाण्याबरोबरच पानवेली देखील रामकुंड परिसरात वाहून आले आहेत. संपूर्ण रामकुंड परिसर पानवेलींनी व्यापला आहे.  सध्या गंगापूर धरणांतून  2557 क्युसेक  वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. टप्प्याटप्प्यानं या विसर्गात वाढ केली जाणार असल्यानं नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे.

साताऱ्यात मुसळधार 

साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

पालघरमध्ये पावसाच्या हलक्या सरी

पालघरमध्ये आजही अधून मधून पाऊस सुरू असून जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाची पाणी पातळी 118.60 मीटर पर्यंत पोचली असून हे धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास या दोन्ही धरणातून मिळून 8475 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा 

मुंबईसह कोकणात कोसळणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वेला फटका बसला असून कोकणात येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई मडगाव अप डाऊन  जनशताब्दी एक्सप्रेस दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई ते मडगांव वंदे भारत एक्सप्रेस अप डाऊन दोन्ही रद्द करण्यात आल्या आहेत. पण, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसणार आहे. मुंबईतून गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत.

पाहा व्हिडीओ : Monsoon Superfast: राज्यात पावसाचा हाहाकार, नद्या ओव्हरफ्लो, अनेक ठिकाणी पूर

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Rain Updates: मुंबईवरील अतिवृष्टीचं संकट कधी दूर होणार? हवामान खात्यानं दिली महत्त्वाची अपडेट, कमी दाबाचा पट्टा सरकायला सुरुवात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Embed widget