एक्स्प्लोर

Maharashtra Rain Updates: मुंबईला ऑरेंज, तर ठाणे, नाशिकला रेड अलर्ट; राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला आहे, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकल्यानं पावसाचा जोर ओसरणार असल्याची हवामान विभागाची माहिती.

Maharashtra Mumbai Rain Updates: दोन दिवस पावसानं मुंबईला (Mumbai Rain) झोडपल्यानंतर आज मात्र, उसंत घेतली आहे. मुंबईच्या अनेक भागांत पावसानं विश्रांती घेतली आहे. तर, काही भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट (Orange Alert For Mumbai) देण्यात आला आहे. तसेच, नाशिक, पुणे, साताऱ्यातील घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात खबरदारी म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या 48 तास एमएमआरसाठी रेड अलर्ट होता आणि तसाच मुसळधार पाऊसही पडला. मात्र सहानंतर हा अलर्ट कमी करत ऑरेंज केला आहे. मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून पावसानं हजेरी लावली. आज मुंबईतील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुपारपर्यंत मुंबईतील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडसाठी आज देखील रेड अलर्ट कायम असून अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय नाशिक, सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाल्यानं पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर विदर्भात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांसह पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबईला ऑरेंज अलर्ट 

मुंबईसाठी आज देखील ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकल्यानं पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. मोठा पाऊस होणार नसला तरीसुद्धा खबरदारी म्हणून हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज दुपारनंतर पावसाचा जोर ओसरणार असून उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पावसामुळे वसई विरार जलमय, 12 तासांपासून लाईट नाही 

वसई, विरार, नालासोपारामधील काही भाग 12 तासांपासून पाण्याखाली आहे.  तिथल विद्युत सप्लाय बंद असल्यानं नागरिकांचे हाल झाले आहेत.  कालच्या पावसामुळे वसई विरार जलमय झालं होतं. अनेक सखल भागातील सोसायट्यांमध्ये पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या मीटर बॉक्सपर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे महावितरणाने खबरदारी घेत वीज सप्लाय बंद केला होता. ज्या सोसायटीचे पाणी उतरले तेथील ट्रान्सफार्म सुरु करण्यात आले. मात्र अजही वसई विरार आणि नालासोपारातील काही भागातील पाणी ओसरलं नसल्याने वीज नाही आहे. जवळपास 12 तासांपासून काही ठिकाणी वीज नाही आहे. 

नाशिकला रेड अलर्ट, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोदाकाठावरील मंदिरना पाण्यानं वेढा द्यायला सुरुवात झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागलं आहे  नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाण्याबरोबरच पानवेली देखील रामकुंड परिसरात वाहून आले आहेत. संपूर्ण रामकुंड परिसर पानवेलींनी व्यापला आहे.  सध्या गंगापूर धरणांतून  2557 क्युसेक  वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. टप्प्याटप्प्यानं या विसर्गात वाढ केली जाणार असल्यानं नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे.

साताऱ्यात मुसळधार 

साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

पालघरमध्ये पावसाच्या हलक्या सरी

पालघरमध्ये आजही अधून मधून पाऊस सुरू असून जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाची पाणी पातळी 118.60 मीटर पर्यंत पोचली असून हे धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास या दोन्ही धरणातून मिळून 8475 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा 

मुंबईसह कोकणात कोसळणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वेला फटका बसला असून कोकणात येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई मडगाव अप डाऊन  जनशताब्दी एक्सप्रेस दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई ते मडगांव वंदे भारत एक्सप्रेस अप डाऊन दोन्ही रद्द करण्यात आल्या आहेत. पण, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसणार आहे. मुंबईतून गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत.

पाहा व्हिडीओ : Monsoon Superfast: राज्यात पावसाचा हाहाकार, नद्या ओव्हरफ्लो, अनेक ठिकाणी पूर

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Rain Updates: मुंबईवरील अतिवृष्टीचं संकट कधी दूर होणार? हवामान खात्यानं दिली महत्त्वाची अपडेट, कमी दाबाचा पट्टा सरकायला सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
Nashik Vidhan Parishad Election 2026: 'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
Donald Trump : इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
Iran War Live Update: 'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
FIFA World Cup : दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
Embed widget