एक्स्प्लोर

Maharashtra Rain Updates: मुंबईला ऑरेंज, तर ठाणे, नाशिकला रेड अलर्ट; राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला आहे, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकल्यानं पावसाचा जोर ओसरणार असल्याची हवामान विभागाची माहिती.

Maharashtra Mumbai Rain Updates: दोन दिवस पावसानं मुंबईला (Mumbai Rain) झोडपल्यानंतर आज मात्र, उसंत घेतली आहे. मुंबईच्या अनेक भागांत पावसानं विश्रांती घेतली आहे. तर, काही भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट (Orange Alert For Mumbai) देण्यात आला आहे. तसेच, नाशिक, पुणे, साताऱ्यातील घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात खबरदारी म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या 48 तास एमएमआरसाठी रेड अलर्ट होता आणि तसाच मुसळधार पाऊसही पडला. मात्र सहानंतर हा अलर्ट कमी करत ऑरेंज केला आहे. मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून पावसानं हजेरी लावली. आज मुंबईतील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुपारपर्यंत मुंबईतील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडसाठी आज देखील रेड अलर्ट कायम असून अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय नाशिक, सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाल्यानं पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर विदर्भात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांसह पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबईला ऑरेंज अलर्ट 

मुंबईसाठी आज देखील ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकल्यानं पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. मोठा पाऊस होणार नसला तरीसुद्धा खबरदारी म्हणून हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज दुपारनंतर पावसाचा जोर ओसरणार असून उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पावसामुळे वसई विरार जलमय, 12 तासांपासून लाईट नाही 

वसई, विरार, नालासोपारामधील काही भाग 12 तासांपासून पाण्याखाली आहे.  तिथल विद्युत सप्लाय बंद असल्यानं नागरिकांचे हाल झाले आहेत.  कालच्या पावसामुळे वसई विरार जलमय झालं होतं. अनेक सखल भागातील सोसायट्यांमध्ये पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या मीटर बॉक्सपर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे महावितरणाने खबरदारी घेत वीज सप्लाय बंद केला होता. ज्या सोसायटीचे पाणी उतरले तेथील ट्रान्सफार्म सुरु करण्यात आले. मात्र अजही वसई विरार आणि नालासोपारातील काही भागातील पाणी ओसरलं नसल्याने वीज नाही आहे. जवळपास 12 तासांपासून काही ठिकाणी वीज नाही आहे. 

नाशिकला रेड अलर्ट, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोदाकाठावरील मंदिरना पाण्यानं वेढा द्यायला सुरुवात झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागलं आहे  नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाण्याबरोबरच पानवेली देखील रामकुंड परिसरात वाहून आले आहेत. संपूर्ण रामकुंड परिसर पानवेलींनी व्यापला आहे.  सध्या गंगापूर धरणांतून  2557 क्युसेक  वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. टप्प्याटप्प्यानं या विसर्गात वाढ केली जाणार असल्यानं नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे.

साताऱ्यात मुसळधार 

साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

पालघरमध्ये पावसाच्या हलक्या सरी

पालघरमध्ये आजही अधून मधून पाऊस सुरू असून जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाची पाणी पातळी 118.60 मीटर पर्यंत पोचली असून हे धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास या दोन्ही धरणातून मिळून 8475 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा 

मुंबईसह कोकणात कोसळणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वेला फटका बसला असून कोकणात येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई मडगाव अप डाऊन  जनशताब्दी एक्सप्रेस दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई ते मडगांव वंदे भारत एक्सप्रेस अप डाऊन दोन्ही रद्द करण्यात आल्या आहेत. पण, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसणार आहे. मुंबईतून गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत.

पाहा व्हिडीओ : Monsoon Superfast: राज्यात पावसाचा हाहाकार, नद्या ओव्हरफ्लो, अनेक ठिकाणी पूर

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Rain Updates: मुंबईवरील अतिवृष्टीचं संकट कधी दूर होणार? हवामान खात्यानं दिली महत्त्वाची अपडेट, कमी दाबाचा पट्टा सरकायला सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget