Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 16 Nov 2021 09:03 AM
अमरावती शहरात चार तासांची संचारबंदीतून शिथिलता


 अमरावती शहरात उद्यापासून चार तासांची संचारबंदीतून शिथिलता देण्यात आली आहे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानं उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. उद्यापासून शहरातील सर्व बँका उघडणार पण इंटरनेट बंद असल्याने व्यवहार बंद राहण्याची शक्यता आहे.  इंटरनेट सेवा 19 तारखेच्या दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती अमरावती पोलिस आयुक्त कार्यालयाने दिली आहे. 

सगळेच मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहेत - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री आहेत पण त्यांना मानायला कुणी तयार नाही. सगळेच मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही. गांजा, हर्बल तंबाखू, दंगली, वसुलीवर महाविकास आघाडीचं सरकार चर्चा करत आहे.

महाराष्ट्रात सरकार कुठे आहे हे विचारण्याची वेळ आली आहे: देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात सरकार कुठे आहे हे विचारण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा: देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आम्हा सर्वांकडून शुभेच्छा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

पूर्वांचल एक्स्प्रेसवेचं आज उद्घाटन, पंतप्रधान मोदी वायूसेनाच्या विमानानं कार्यक्रम स्थळी पोहचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 340 किमीच्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं उद्घाटन करणार आहेत. कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वायूसेनाच्या विमानानं पोहचले आहेत. 

नवाब मलिकांचा नवा खुलासा, whatsapp चॅट केलं पोस्ट; म्हणाले काशिफ खानची चौकशी का नाही?

Mumbai Cruise Party : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु केली. समीर वानखेडे यांच्या कारवाईवर मलिक यांनी सातत्यानं आक्षेप घेत पुरावे सादर केले. पत्रकार परिषदांमधून मलिकांनी समीर वानखेडे आणि भाजपावर सातत्यानं निशाणा साधलाय. नवाब मलिक यांनी ट्विट करत आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलाय. नवाब मलिक यांनी के.पी गोसावी आणि एका दिल्लीच्या व्यक्तीच्या संभाषणाचं व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. तसेच पुन्हा एकदा काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्या संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. 


अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे, के. पी गोसावी आणि काशिफ खान यांच्यावर निशाणा साधला. ट्विटमध्ये त्यांनी गोसावी आणि एका व्यक्तीमध्ये काशिफ खान संदर्भात झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. ट्विटमध्ये मलिक म्हणतात की, हे आहे के.पी. गोसावी आणि खबरी यांच्यामध्ये काशिफ खानबद्दल झालेलं संभाषणाचं व्हॉट्सअप चॅट. काशिफ खानला प्रश्न का विचेरले जात नाहीत. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यातील संबध काय? असे प्रश्न मलिक यांनी उपस्थित केलेय. तसेच व्हॉट्सअप संभाषणाचा स्क्रीनशॉटही पोस्ट केलाय. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ABP Majha Impact : मराठी शाळा वाचवा मोहीम! मराठी भाषा अध्ययन सक्तीने सुरु न करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार

Marathi School : गेल्या काही दिवसांपासून एबीपी माझानं 'मराठी शाळा वाचवा' ही मोहीम लावून धरली आहे. आता या मोहीमेची दखल शिक्षण विभागानं घेतली आहे. एबीपी माझाच्या मोहिमेनंतर शिक्षण विभागानं परिपत्रक काढून मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन सक्तीनं सुरु न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. 


महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबत अधिनियम 2020 अंतर्गत सक्तीचा असलेला मराठी विषय शिकवत नसलेल्या शाळांवर कारवाई होणार आहे. एक लाख रुपयांपर्यंत शाळांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच शाळांकडून यासंदर्भात खुलासाही मागितला जाणार आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करणार?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यासाठीच्या याचिकेवर आज निर्णय येणं अपेक्षित आहे. ५ वेगवेगळ्या खंडणी प्रकरणी आरोपी असलेले परमबीर यांना फरार घोषित करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अर्ज केला. त्यावर आज निकाल येण्याची शक्यता आहे. परमबीर यांच्या व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींनाही फरार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे. न्यायालयानं या तिन्ही आरोपींविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर ते बजावण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींना त्यांच्या पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे आढळले नाहीत.

अमरावतीतील इंटरनेट सेवा दुपारनंतर पूर्ववत होण्याची शक्यता

त्रिपुरातील कथित घटनेनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अमरावती शहर वगळता जिल्ह्यातील संचारबंदी सलग चौथ्या दिवशी कायम आहे. तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आणखी २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आलीए. त्यामुळे आज दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. 

दक्षिण मुंबईतील प्रदूषण वाढलं; प्रदूषणाचा निर्देशांक 345 अंकावर

सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजतोय. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलंय. मात्र काल, म्हणजे सोमवारी दक्षिण मुंबईतली हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित होती.. समुद्रावरुन वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळं वाढलेलं प्रदूषण. या सगळ्यांचा विपरित परिणाम दक्षिण मुंबईतल्या हवेवर झाला. काल दक्षिण मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा निर्देशांक ३४५ अंकावर जाऊन पोहोचला होता. तर काल दिल्लीतल्या प्रदूषणाचा निर्देशांक ३३१ अंक इतका होता.  तेव्हा मुंबईची दिल्ली होऊ नये याची जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे.

पार्श्वभूमी

अमरावतीत सलग चौथ्या दिवशी संचारबंदी कायम, इंटरनेट सुरु होणार की बंदच राहणार यावर आज निर्णय 


Amravati Violence : त्रिपुरातील कथित घटनेनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अमरावती शहर वगळता जिल्ह्यातील संचारबंदी सलग चौथ्या दिवशी कायम आहे. तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आणखी 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. पण उद्यापासून इंटरनेट सेवा सुरु होते की, बंदच राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर तिकडे अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटक केलेले भाजप नेते अनिल बोंडेंसह (Anil Bonde Arrest) सर्व भाजप नेत्यांना जामीन मंजूर झाला आहे. काल सकाळी अमरावती पोलिसांनी बोंडेंसह भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, गटनेते तुषार भारतीय, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्यासह 12 जणांना अटक केली होती. 


शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांना मुंबई पोलिसांचं दुसरं समन्स; चौकशीसाठी गैरहजर


Mumbai Cruise Drug Case :  क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलच्या एफिडेबिटसोबतच इतर तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल इन्क्वॉयरी टीम (SIT) तयार केली आहे. या पथकानं पुन्हा तपास सुरु केला, पण तपास पुन्हा एकदा थांबला कारण, दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर हजर झालीच नाही. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय कारवाई करावी यासाठी मुंबई पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. 


मुंबईतील अग्नितांडव आटोक्यात, सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरसह सफोला तेलाच्या गोदामाचं मोठं नुकसान


Mumbai kanjurmarg Fire : मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील अपेक्स कंपाऊंडमध्ये असलेल्या सॅमसंगचा सर्विस सेंटरमध्ये लागलेली आग मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास नियंत्रणात आली आहे. काल रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 18 ते 20 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. तब्बल साडे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.  


सध्या सर्विस सेंटरमध्ये फायर कूलिंगचे काम सुरू आहे.  सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र सॅमसंग कंपनीचं मोठ्याप्रमाणात सामान जळून खाक झालं आहे. तर बाजूला असलेलं सफोला तेलाचं गोडाऊनसुद्धा या आगीमध्ये जळून खाक झाला आहे.


IND vs NZ: जयपूरमधील टी-20 मॅचवर प्रदुषणाचं सावट


India v New Zealand : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे.. अशातच जयपूर येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यावर दूषित हवामानाचे सावट उभे ठाकले आहे. जयपूरमधील प्रदूषणाची पातळी गेल्या आठवडय़ाभरात वाढली असल्याने पहिल्या लढतीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जयपूरच्या सभोवताली असणाऱ्या दिल्ली, गुडगांव, सोनपत यांसारख्या शहरांतील हवामान दूषित झाले असून हवेचा वेग वाढल्याने जयपूरलासुद्धा त्याचा फटका बसत आहे. तसेच तेथील अनेक नागरिकांना श्वास घेताना अडचण जाणवत असल्याचेही समजते. जयपूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 337 पर्यंत घसरला आहे. दिवाळीदरम्यान हा निर्देशांक 364 इतका होता. भारतातील गेल्या दोन आठवडय़ांतील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे जयपूरमधील टी-20 सामन्यावर परश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपविजेता न्यूझीलंडचा संघ यूएईतून भारतात दाखल झालाय. तर जयपूरमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात  भारतीय संघानं सराव सुरु केलाय.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.