एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, शुक्रवारी राज्यात 3 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले  

Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सक्रिय रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात 1323 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,43,513 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.96% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने - 
सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 329 इतकी झाली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या नऊ हजार १९१ इतकी झाली आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी सत्तर टक्के सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत आहे. ठाणे २१५७, ठाणे ८८४, पालघर ३१४, रायहज ४११ सक्रिय रुग्ण आहेत. 

मुंबईने राज्याची चिंता वाढली -
आज राज्यात ३०८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,०४,७०९ झाली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्याच्या तुलने मुंबईत जवळपास सत्तर टक्के रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शुक्रवारी तब्बल १९५६ दैनंदिन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ठाणे मनपा २२२, नवी मुंबई मनपा २०१, पुणे मनपा १३५ रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

देशाची सक्रिय रुग्णांची संख्या 36 हजारांवर - 
कोरोनाची संभाव्य चौथी लाट लवकरच धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 7584 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये कोरोना चांगलाच फोफावताना दिसत आहे. महाराष्ट्रत दिवसागणिक मोठी रुग्णवाढ पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा बंदिस्त जागी मास्क सक्ती लागू करत नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या 36 हजार 267 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर रुग्ण सकारात्मकता दर 0.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारी दिवसभरात 3791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 44 हजार 92 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget