एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात आज 832 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 841 रुग्ण कोरोनामुक्त

Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत अल्पसा चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 832 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 81 हजार 640 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के आहे.

राज्यात आज 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 8,193 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 85 हजार 874 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1043 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,53,57,358  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  66,34,444 (10.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत 217 रुग्णांची नोंद तर चार जणांचा मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात 217 रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात एकूण 247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढून 2658 इतका झाला आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचा साप्ताहिक कोरोना वृद्धी दर 0.02 'टक्क्यांवर आला आहे. त्या आधी तो 0.03 टक्के इतका होता. गणेशोत्सवानंतरच्या काळात तो 0.06 टक्क्यांवर पोहोचला होता.  

देशातील स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 8 हजार 774 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 9 हजार 481 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत 621 जणांचा मृत्यू झालाय. दोन दिवसांच्या दैनंदिन आकडेवारी पाहिल्यास मृताच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतेय. शनिवारी देशात 465  जणांचा मृत्यू झाला होता.  

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या एक लाख पाच हजार 691 इतकी झाली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्यामध्ये चढउतार पाहायला मिळतोय.  शनिवारी देशात 8 हजार 318 नवे रुग्ण आणि 465 जणांच्या मृत्यू नोंद करण्यात आली होती. तर 10 हजार 967 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. 

देशात आतापर्यंत 121.94 कोटी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.  देशाचा रिकव्हरी रेट 98.34 टक्क्यांवर पोहचला. मार्च 2020 पासूनचा हा सर्वाधिक दर आहे. देशात आतापर्यंत 3,39,98,278 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget