Maharashtra Corona Update : राज्यात आज 4, 355 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4240 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज 119 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

मुंबई : राज्यात आज 4,355 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 43 हजार 034 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे.
राज्यात आज 119 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 49 हजार 752 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11,962 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (37), नंदूरबार (1), जालना (85), परभणी (19), धुळे (21), परभणी (14), हिंगोली (19), नांदेड (36), अमरावती (91), अकोला (17), वाशिम (10), बुलढाणा (27), यवतमाळ (02), नागपूर (93), वर्धा (6), भंडारा (6), गोंदिया (4), गडचिरोली (22) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
मालेगाव, धुळे, जळगाव, जालना, हिंगोली, परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 26,32,810 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,32, 649 (12.22 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,01,955 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,330 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 270 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 270 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 279 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,20,478 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2791 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1958 दिवसांवर गेला आहे.
देशात गेल्या 24 तासात 25,467 नव्या रुग्णांची नोंद
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसून नव्या रुग्णांची मोठी आकडेवारी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाची 25 हजार 467 नव्या रुग्णांची भर पडली असून 354 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 39 हजार 486 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी सोमवारी देशात 25,072 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती, तर 389 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.























