एक्स्प्लोर

Maharashtra : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, 'मविआ' सरकारने केलेल्या बदल्या रोखल्या  

Maharashtra : महाविकास आघाडी सरकारने केलेल्या बदल्या शिंदे-फडणवीस  सरकारकडून रोखण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमधील तीन बदल्यांना शिंदे- फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. 

मुंबई : राजकीय धक्क्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray  ) यांना शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या बदल्या शिंदे-फडणवीस  सरकारकडून रोखण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमधील तीन बदल्यांना शिंदे- फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. 

ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये तीन बदल्या केल्या होत्या. या बदल्या ठाकरे सरकारला अनुकूल होत्या. परंतु, सरकार बदलल्यानंतर या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. सध्या या सर्व ठिकाणी जैसे थे स्थिती आहे. 

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेत आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. तर सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुंडे यांची बदली करण्यात आली होती. याबरोबरच औरंगाबादचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची सिडकोमध्ये दीपा मुंडे यांच्या जागी बदली करण्यात आली होती. या सर्व बदल्या शिंदे- फडणवीस सरकारने रोखल्या आहेत. 

29 जून रोजी ठाकरे सरकारची शेवटी कॅबिनेट बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. अभिजीत चौधरी, दीपा मुंडे आणि अस्तिक कुमार पांडे यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. याच मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. 

कायद्याप्रमाणे जून अखेर प्रशासकीय बदल्या होणे अपेक्षित असते. परंतु, अजूनही अनेक प्रशासकीय बदल्या रखडलेल्या आहेत. शिवाय ज्या बदल्या झाल्या आहेत त्यांच्याबाबत देखील आता संदिग्धता निर्माण झाली आहे.  

दरम्यान, फक्त बदल्या रोखण्यावरच न थांबता शिंदे-फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना देखील स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सरकार आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या

IPS Transfer : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा यादी

IAS टीना दाबी जैसलमेरच्या नव्या जिल्हाधिकारी, IAS प्रदीप गवांडे यांचीही बदली; राजस्थान सरकारकडून 29 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
Ganesh Naik : आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो, गणेश नाईक यांचं वक्तव्य चर्चेत
आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो : गणेश नाईक
दक्षिणेतून स्तंभ हातात घेऊन टोळी येते आणि सदनात चक्कर टाकून त्याठिकाणी तो स्तंभ स्थिर करते, हा निर्णय कुणी घेतला याची चर्चा  होत नाही : शरद पवार
संविधानासमोर डोकं ठेवलं की लोकशाही जतन करण्याच्या जबाबदारीतून मुक्त झालो असा विचार राज्यकर्ते करतात : शरद पवार
शहीद कॅप्टनसाठी अशीही देशभक्ती; जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा तब्बल 5000 वा एकपात्री प्रयोग, जागवल्या आठवणी
शहीद कॅप्टनसाठी अशीही देशभक्ती; जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा तब्बल 5000 वा एकपात्री प्रयोग, जागवल्या आठवणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
Ganesh Naik : आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो, गणेश नाईक यांचं वक्तव्य चर्चेत
आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो : गणेश नाईक
दक्षिणेतून स्तंभ हातात घेऊन टोळी येते आणि सदनात चक्कर टाकून त्याठिकाणी तो स्तंभ स्थिर करते, हा निर्णय कुणी घेतला याची चर्चा  होत नाही : शरद पवार
संविधानासमोर डोकं ठेवलं की लोकशाही जतन करण्याच्या जबाबदारीतून मुक्त झालो असा विचार राज्यकर्ते करतात : शरद पवार
शहीद कॅप्टनसाठी अशीही देशभक्ती; जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा तब्बल 5000 वा एकपात्री प्रयोग, जागवल्या आठवणी
शहीद कॅप्टनसाठी अशीही देशभक्ती; जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा तब्बल 5000 वा एकपात्री प्रयोग, जागवल्या आठवणी
CBSE Date Sheet : सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार  
सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार
Asaram Bapu : शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या पत्रात भरभरुन काळजी; मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या
पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या पत्रात भरभरुन काळजी; मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
Embed widget